कृषिमंत्रीच रमीत गुंग, शेतकऱ्यांचे काय भले होणार? काय दुर्दैव शेतकऱ्यांचे.. कृषिमंत्रीच रमी खेळताना मिटींग करतंय. विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या संबंधित समिती गठीत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी कोणत्या उपाययोजना करू, याच्यासाठी समिती गठीत केली मात्र कृषी मंत्र्यांकडून आठवी नववी चूक असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल करत बच्चू कडूंनी माणिकराव कोकाटे यांच्यावर संताप व्यक्त केला. पुढे ते असेही म्हणाले की, एकीकडे म्हणायचे तुम्ही दारू पिताय, लग्नात खर्च होतोय म्हणून तुमच्यावर कर्ज होतंय. पण आमचा कृषिमंत्रीच रमीत गुंग असेल तर शेतकऱ्याचे काय भले होईल, असा संताप बच्चू कडू यांन माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओवर व्यक्त केला आहे.
पुणे- राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या सभागृहात रमी गेम खेळता नाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. या प्रकारावरून कोकाटेंवर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही यावर प्रतिक्रिया देत कृषि मंत्र्यांना थेट जोकर म्हटले आहे. तसेच त्यांनी मंत्रिपदी न राहण्याच्या सर्व अटी पूर्ण केल्या, असा टोलाही लगावला.
सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते रमी खेळत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतीचे प्रश्न प्रलंबित आहेत, आणि कृषिमंत्री मात्र खेळण्यात दंग आहेत. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या,” असे रोहित पवार यांनी म्हटले. त्यानंतर आता रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत माणिकराव कोकाटेंना लक्ष्य केले आहे.
नेमक्या काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
एक्का, दुर्री, तुर्ती आणि हा बघा जोकर… शेतकऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करून मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळत आहेत. मंत्रीपद न राहण्याच्या सर्व अटी कृषीमंत्र्यांनी पूर्ण केल्या आहेत, असा टोला रोहिण खडसे यांनी लगावला. त्यांच्या खात्यात भ्रष्टाचार होतोय. ते शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात. अर्वाच्य भाषेत बोलतात. पण शेतकऱ्यांबाबत एकही काम करत नाही, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला.

