पुणे- विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात सरसकट कार्यकर्त्यांना बंदी घातली तर ते अन्यायकारक होईल असे मत पुण्याच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांनी मांडले आहे. पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यात झालेल्या हाणामारी मुळे आज विधान सभा अध्यक्ष यांनी आपले काही निर्णय जारी केले आहेत . ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना जरूर कडक च शिक्षा व्हावी पण जे खऱ्या अर्थाने येथे जनतेचे प्रश्न घेऊन येतात काही शिकायला येतात अशा सरसकट कार्यकर्त्यांचा बळी या निर्णयाने गेला नाही तर बरे होईल असे रुपली पाटील म्हणाल्या आहेत.
सरसकट सर्वच कार्यकर्त्यांना शिक्षा कशासाठी ? रुपाली पाटलांचा सवाल
Date:

