मुंबई-सत्ताधारी पक्षाच्या आमदाराना परवाने देण्यासाठी नवीन ३२८ दारू दुकानांना परवानगी दिली जात आहे का? असा सवाल आज विधानपरिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला.
ते म्हणाले, राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या वतीने राज्यामध्ये ३२८ नवीन दारूचे परवाने देण्यात येत आहे.८ महसूली विभागात हे परवाने दिले जाणार आहे. १९७२ पासून असे परवाने राज्यात बंद होते. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे मद्य धोरण आखण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीतील लोकं दारूचे वितरण व पुरवठा व्यवस्था नियंत्रित करत असते. राज्याचा महसूल वाढविण्यासाठी अशाप्रकारे दारूच्या ३२८ नवीन दुकानांना परवाने दिले जात असतील तर ते राज्याच्या दृष्टीने योग्य नाही.माता – भगिनी यांचा या धोरणाला कठोर विरोध आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराना परवाने देण्यासाठी हे नवीन ३२८ दुकानांना परवानगी दिली जात आहे का? अशी स्थिती असेल तर या धोरणाला आमचा विरोध असणार आहे. राज्याचे जनजीवन या धोरणामुळे विस्कळीत होऊ शकते या हेतूने आज विधान परिषद सभागृहात २८९ अन्वये चर्चेची मागणी त्यांनी यावेळी केली.

