मुंबई-आदित्य ठाकरे म्हणाले, शहरांमध्ये प्रशासक बसवले आहेत, नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी नेमके जायचे कोणाकडे? अनेक कामे अशी काढली जातात की कुठे तरी गफलत झालेली आहे. लोकांमधून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्याने यांना काही पडलेली नाही. नद्यांच्या विषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, प्रत्येक नदी वेगळी असते. पुण्यातील नद्या दूषित झाल्या आहेत. पंधरा मिनिटांच्या पावसात पूर परिस्थिती निर्माण होते. नद्यांचे नियोजन व्यवस्थित केले गेले पाहिजे. पुणे शहर बुडून जात आहे. झाडांच्या कत्तली केल्या जात आहेत. माझी मागणी हीच आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनात बैठक घ्यावी आणि पुण्यातील नद्यांचा प्रश्न मार्गी लावावा.
स्थानिक स्वराज्य संथांचे स्वराज्य हिरावून घेऊन ते स्ववर्चस्वा खालील अधिकारी शासित केले- आदित्य ठाकरे
Date:

