पुणे-पुणे महापालिकेचे विभाजन करा असा प्रस्ताव सरकारला पाठवणार असल्याची माहिती एस एम जोशी सभागृहात झालेल्या बैठकीनंतर मान्यवर नेत्यांनी दिली या बैठकीला यावेळी अंकुश काकडे, प्रशांत जगताप, सौ. राजलक्ष्मी भोसले, संजय बालगुडे, श्रीकांत शिरोळे, जालिंदर कामठे, आश्विनी कदम, निता परदेशी, शिवा मंत्रि, विरेंद्र किराड, नरेंद्र व्यवहारें, आबा बागूल, सुभाष जगताप, उज्वल केसकर, नितीन कदम, प्रवीण तुपे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेचे स्थापना १९५० साली झाली. त्यानंतर १९९७ साली पहिल्यांदा महानगरपालिका क्षेत्राचा विस्तार झाला. त्यानंतर २०१७ पासून ३४ गावांचा समावेश झाला व त्यानंतर २ गावे वगळण्यात आली. सातत्याने विविध गावांचा महानगरपालिका क्षेत्रात समावेश सुरू आहे. एकीकडे महानगरपालिकेचे क्षेत्र वाढत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी व एकूणच सोयी सुविधा मात्र वाढताना दिसत नाहीत. नव्याने समाविष्ट झालेली गावं झपाट्याने ओसाड होत आहेत.
म्हणूनच पुणे महानगरपालिका क्षेत्राचे दोन महानगरपालिकांमध्ये विभाजन करावे अशी मागणी जोर धरत आहे. याच विषयावर मंथन करण्यासाठी माजी महापौर अंकुश काकडे व संजय बालगुडे यांनी चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्रात पुणे शहराचे सर्वपक्षीय माजी महापौर, माजी उपमहापौर, जि.प.चे माजी अध्यक्ष, मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यांनी सहभाग घेऊन चर्चा केली. या चर्चेअंती पुणे महानगरपालिकेचे विभाजन करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या संमतीने प्रस्ताव सरकारला पाठवण्यावर एकमत झाले आहे.

