“सुविधा द्या अन्यथा न्यायालयात दाद मागणार – अमोल नाना तुपे यांचा आक्रमक इशारा!
“स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी झगडावं लागत असेल, तर हा विकासाचा कुठला चेहरा आहे?”
पुणे- साडेसतरानळीतील नागरीकांचा आज संताप शिगेला पोहोचला. पुणे महापालिकेच्या हद्दीत २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या या भागातील नागरीकांना आज आठ वर्षांनंतरही पाणी, वीज, रस्ते आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांनी आज तीव्र आंदोलन छेडत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं.
या आंदोलनाचं नेतृत्व क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी केलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जर या भागातील समस्या तातडीने सुटल्या नाहीत, तर आम्ही थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठवू!”
🛑 सत्ताधाऱ्यांचे दोन आमदार असूनही साडेसतरानळीला सुविधा नाहीत!
हडपसर विधानसभा मतदारसंघातून दोन सत्ताधारी आमदार असताना देखील या भागात कोणतीच सुधारणा झालेली नाही, अशी तिव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान नागरिक अक्षरश: आक्रमक झाले होते. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
📌 साडेसतरानळीतील प्रमुख समस्या
⛔ पिण्याच्या पाण्याचा तीव्र टंचाई – गावात शुद्ध व सुरक्षित पाण्याची कोणतीही हमी नाही. नागरिकांना लांबून पाणी आणावं लागतं.
⛔ खड्डेमय रस्ते – अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची अवस्था दयनीय, अपघातांचं प्रमाण वाढलंय.
⛔ वारंवार वीज खंडित – अभ्यास, कामकाज विस्कळीत.
⛔ आरोग्य सेवा शून्य – गावात प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही.
⛔ स्वच्छता व कचरा व्यवस्थापन नाही – गटारी, शौचालयांचा अभाव. आजारांचं प्रमाण वाढलंय.
⛔ कर भरूनही सुविधा नाहीत – घरपट्टी, अन्य कर नियमितपणे घेतले जात आहेत, पण त्या बदल्यात काहीच नाही!
📣 ग्रामस्थांच्या ठाम मागण्या…
📍 शुद्ध पिण्याच्या पाण्याची तात्काळ योजना
📍 सर्व रस्त्यांचं डांबरीकरण आणि दुरुस्ती
📍 वीजपुरवठा सुरळीत करणं
📍 प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी
📍 कचरा व्यवस्थापन व स्वच्छतागृहांची व्यवस्था
📍 कराच्या बदल्यात सुविधा द्याव्यात
🗣️ “न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही!” – अमोल नाना तुपे
अमोल नाना तुपे यांनी यावेळी जोरदार इशारा दिला, “जर आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्हाला महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करावं लागेल. या भागाला महापालिकेत सामावून घेऊन जर सुविधा दिल्या जात नसतील, तर तेच चुकीचं ठरतं!”
📸 …आणि ग्रामस्थांचा संताप कॅमेऱ्यात कैद!
या आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग होता. हातात पत्रके, घोषणांनी परिसर दणाणून गेला. गावकऱ्यांच्या डोळ्यात असहायतेचा नाही, तर झगड्याचा ज्वाला होता!
🟥 साडेसतरानळीतील नागरीकांच्या व्यथा फक्त घोषणांपुरत्या नाहीत – त्यांना आता कृती हवी आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं, हीच काळाची गरज आहे!

