पुणे-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड किल्ल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी प्रदेश” म्हणून मानांकन मिळाल्याबद्दल येथील माजी उपमहापौर आणि युवकात लोकप्रिय असलेले नेते दीपक मानकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन देत त्यांचे आणि भारत सरकार व महायुती सरकारचे आभार मानले.
दीपक मानकर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या,शौर्यगाथेची साक्ष देणारे महाराष्ट्रातील किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला असे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रवासीयांकडून भारत सरकार, महायुती सरकार सर्वांचे मन:पूर्वक आभार…!

