पुणे-भाजप हा नेहमीच कार्यकर्ता यांना वेगवेगळ्या संधी देत असतो. कार्यकर्ता याची क्षमता पाहून त्याला वेगवेगळी संधी दिली जाते. भाजप पक्ष हा पुढील पिढी देखील दूरदृष्टीने तयार करत असतो. खासदार मुरलीधर मोहोळ हे त्यांना दिलेले काम झोकून देऊन करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. राजकीय आणि प्रशासकीय कामात ते कुस्ती परंपरा प्रमाणे कौशल्यपूर्वक एकाचवेळी विविध कामे करतात. कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी नियोजनबद्ध काम केले त्यामुळे देशात त्यांचे नाव झाले. सदर काळात विविध क्षेत्रासाठी आणि लोकांकरिता त्यांनी अतुलनीय काम केले. संयम न सोडता आणि पाठपुरावा करून त्यांनी आपले काम आतापर्यंत केले. संकटात जो काम करतो तो खरा नेता असतो. त्याचमुळे त्यांची नवी ओळख निर्माण झाली असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक विभाग राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने “24 तास जनसंपर्क कार्यालय” शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन तसेच कोरोना काळातील अनुभव कथन करणारे ” प्रथम माणूस”पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मध्यंतरी एक बातमी पाहिली की, देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर विशेष प्रेम असून ते नऊ वेळा पुण्यात आले, पण असे मी काही मोजत नाही. मुरलीधर मोहोळ त्यांचे कार्यालयाचे उद्घाटन आणि वर्षपूर्ती कार्याचे अहवाल प्रकाशन करत आहे ही महत्वाची गोष्ट आहे. देशात कोणत्याही खासदाराचे अशाप्रकारे नागरिकांसाठी २४/७ कार्यालय पाहिले आहे. स्व. गिरीश बापट यांनी चांगले नेतृत्व पुण्याचे केले. त्यांच्या नंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकमुखाने खासदार पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव ठरवले. मोहोळ निवडून आल्यावर त्यांना देशातील महत्त्वाचे खाते काम करण्यासाठी मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत ते काम करत आहे. त्यांची शिस्त कडक आहे. तेथील पद हे जबाबदारीचे असून ते उपभोगता येत नाही. अमित शाह यांनी मला खासगी गप्पात सांगितले की, मुरलीधर मोहोळ चांगला नेता असून अभ्यासू असल्याने त्यांचे भविष्य उज्वल आहे. त्यामुळे त्यांचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. देशभरात मुरलीधर मोहोळ फिरून विविध दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करत आहे. सातत्याने विविध ठिकाणी फिरून दांडगा जनसंपर्क देखील ते करत आहे. तसेच पुण्याचे केंद्राकडे असलेले विषय सातत्याने पाठपुरावा करतात त्यामुळे जागृत प्रतिनिधी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिले आणि महाराष्ट्र सरकार मधील विविध मंत्री यांनी अनेकांशी संवाद साधत राज्यातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यातून जागतिक वारसा स्थळ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले यांचा समावेश नुकताच झाला आहे. विविध आंतरराष्ट्रीय निकष पूर्ण करून ही मान्यता मिळाली आहे. पश्चिम घाटात, जंगल, समुद्र किनारे या जागी अभूतपूर्व स्थापत्य शैली कला किल्ल्याचे माध्यमातून विकसित करण्यात आलेली आहे. जंजिरा सारख्या किल्ल्याची बांधणी अचंबित करणारी आहे. त्यामुळे आता मराठा आणि हिंदवी साम्राज्याचा इतिहास जागतिक स्तरावर व्यापक स्वरूपात पोहचला जाणार आहे. जागतिक पर्यटक आणि अभ्यासक यांच्यासाठी ही ठिकाणे आता महत्वपूर्ण क्षेत्र झाली आहे.
मिसिंग लिंक मधून नवीन इको सिस्टिम
पुणे ते मुंबई दरम्यान द्रुतगती महामार्गावर जो मिसिंग लिंक तयार होत आहे त्यामुळे अर्धा तास प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. देशातील सर्वात लांब नऊ किलोमीटर बोगदा, देशातील सर्वात उंच केबल पूल याठिकाणी तयार होत आहे. तसेच पुण्यात दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच तयार केला जाईल पण नवी मुंबई मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होत आहे. यामुळे नवीन इको सिस्टिम या भागात तयार होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

