मंबई: मुंबईत अधिवेशन सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या गाठीभेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे. शिंदेंनी अचानक केलेल्या या दिल्लीवारीमुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान नियोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना आणि इतर नेत्यांना पाठवल्याची माहिती आहे. तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र यागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
…हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला असून, त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. काल सायंकाळी उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, आणि राजनाथ सिंह यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान एकनाथ शिंदेंच्या या अचानक दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या या भेटींचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच असून, त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना आणि चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांच्या अनुपस्थितीत नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी मंत्री उदय सामंत आणि अन्य नेत्यांना पाठवले, अशी माहितीही समोर आली आहे.

