मराठी भाषिकांच्या आंदोलनात पोलीस कारवाईमुळे मोर्चेकरी संतापले; मिरा भाईंदरमध्ये गंभीर स्थिती
पोलिस राजकीय पक्षाचा अजेंडा चालवताय का?
मुंबई-प्रताप सरनाईक म्हणाले मी पण शेवटी मराठी आहे, आमदार किंवा मंत्री नंतर पण मराठी आधी आहे. मराठी बांधव जर मोर्चा काढत असतील तर त्यांना परवानगी दिली पाहिजे. ती देऊ शकत नसाल तर त्यांच्यावर कारवाई करा, पण रात्री-अपरात्री जाऊन अशी धरपकड करणे योग्य नाही. कुणाला रात्री अशी अटक करायला महायुती सरकारने सांगितले नाही. गृह खात्याने अशी काही आदेश दिले नाही, मी यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. पोलिसांना असे वागणे शोभत नाही, त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. मराठी माणसांच्या भावना लक्षात घेता पोलिसांची कार्यपद्धती ही निंदणीय आहे. पोलिस कुठल्यातरी राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत आहे का? असा सवाल माझ्या मनात निर्माण झाला आहे, असे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की,मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मी मंत्री नंतर आहे, आधी मराठी आहे. पोलिसांनी एका पक्षासाठी (भाजप) काम करू नये. व्यापाऱ्यांच्या (गुजराती, मारवाडी) मोर्चाला परवानगी दिली जाते, मग मराठी लोकांच्या मोर्चाला परवानगी का नाही?
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मी पोलिस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. गृहखात्याचे कोणतेही आदेश नसताना पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून ही धरपकड केली हे समजून घ्यावे लागेल. मीरा रोडमध्ये मराठी स्वाभिमान मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापले असून, याचे पडसाद महायुतीतही उमटू लागले आहेत. शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिस कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले आहे.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, कधी-कधी पोलिसांच्या काही भूमिकेबद्दल संशय निर्माण होतो. मी आताच पोलिस आयुक्तांशी चर्चा करत नाराजी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्यांना पोलिसांनी परवानगी दिली नव्हती तरी त्यांनी मोर्चा काढला. मग जर मराठा एकीकरण समीतीचे लोक मीरा-भाईंदरमधील मराठी लोक एकत्र येत मोर्चा काढत असतील आणि त्याला परवानगी देत येत नसेल तर शांततेच्या मार्गाने त्यांना तो काढू द्या. पण रात्री-अपरात्री कुणाच्या घरी जायचे आणि त्यांना अटक करायची त्यांच्या नावाने नोटीस काढायची हे चुकीचे आहे.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, महायुतीचे सरकार आहे, आमच्या गृहखात्याने पोलिस खात्याला असे काही आदेश दिलेले नाही. असे असताना शहरातील वातावरण खराब करत असतील तर कुठल्यातरी राजकीय पक्षाला किंवा नेत्याला फायदा व्हावा म्हणून पोलिसांकडून ही कारवाई सुरू आहे का? असा सवाल सरनाईक यांनी केला आहे.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रताप सरनाईक पण शेवटी मराठी आहे, आमदार किंवा मंत्री नंतर पण मराठी आधी आहे. मराठी बांधव जर मोर्चा काढत असतील तर त्यांना परवानगी दिली पाहिजे. ती देऊ शकत नसाल तर त्यांच्यावर कारवाई करा, पण रात्री-अपरात्री जाऊन अशी धरपकड करणे योग्य नाही. कुणाला रात्री अशी अटक करायला महायुती सरकारने सांगितले नाही. गृह खात्याने अशी काही आदेश दिले नाही, मी यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. पोलिसांना असे वागणे शोभत नाही, त्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. मराठी माणसांच्या भावना लक्षात घेता पोलिसांची कार्यपद्धती ही निंदणीय आहे. पोलिस कुठल्यातरी राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत आहे का? असा सवाल माझ्या मनात निर्माण झाला आहे.

