Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सुप्रिया सुळेंकडून ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचे स्वागत

Date:

पुणे-ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रात मोठे योगदान दिले आहे. ठाकरे हे फक्त एक नाव नाही, तर एक ब्रँड आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य एकत्र आले, तर त्यांचे मनापासून स्वागत करू. कोणतीही गोष्ट मनापासून केली पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमीलनावर शुक्रवारी भाष्य केले.

खासदार सुप्रिया सुळे शुक्रवार सकाळपासून हिंजवडी आयटी पार्कसह माण मारुंजी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या समस्येची पाहणी केली. त्यानंतर त्या बोलत होत्या. सुळे यांनी 26 जुलैपर्यंत हिंजवडीतील रस्ते दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला अल्टीमेटमदेखील दिला आहे. सुळे म्हणाल्या, की 26 जुलैपर्यंत परिस्थिती सुधारली पाहिजे. अन्यथा, आमचा नाईलाज होईल. हिंजवडीचा विकास झाला पाहिजे. हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विलीन करण्याबाबत नागरिकांचे मत महत्त्वाचे आहे. वेळेत परिस्थिती सुधारली, तर हिंजवडीला येऊन संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करू, असेही त्यांनी सांगितले.

ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रात मोठे योगदान दिले आहे. ठाकरे हे फक्त एक नाव नाही, तर एक महत्त्वाचा ब्रँड आहे. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता ठाकरे आहे. त्यांनी मोठ्या श्रद्धेने शिवसेना बांधली आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य एकत्र आले तर त्यांचे मनापासून स्वागत केले जाते. कोणतीही गोष्ट मनापासून केली पाहिजे. यश आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देश आणि राज्यासाठी योगदान दिले आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्याचा उल्लेख केला जाईल. त्यांचे योगदान कोणीही संपवू शकत नाही, असे मतही सुळे यांनी नोंदवले. राज्यातील गुन्हेगारीला राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारमुळे राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी, माण, मारुंजी या भागाला भेट सुळे यांनी देऊन पाहणी केली. यावेळी हिंजवडी फेज-१ ते माण रस्ता, माण फेज-३ ते मेट्रो स्टेशन कारशेड रस्ता, माण फेज-३ ते मेगापोलीस रस्ता, भोईरवाडी रस्ता, हिंजवडी फेज-२ ते डोहेलर कंपनी रस्ता, हिंजवडी ते मारुंजी रस्ता टी जंक्शन या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ते मंजूर होऊनही ते रस्ते अद्याप झालेले नाहीत. पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. त्याचबरोबर या भागात वीज पुरवठा देखील सतत खंडित होत आहे. या भागात अनेक नवीन प्रकल्प सुरू असून त्यांच्याकडून नियमांचा भंग होत असल्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदूषण आणि इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रचंड त्रास आणि मनस्तापही सहन करावा लागत आहे. या भागातील वाहतुकीची समस्या देखील कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक पायाभूत सुविधांची देखील दुरावस्था झालेली आहे. हिंजवडी येथे देशातील महत्वाचे आयटी पार्क असल्यामुळे येथे अनेक नामांकित कंपन्या आणि हजारो तज्ज्ञ इंजिनियर कार्यरत आहेतं त्यांना या समस्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत लवकरच पुणे जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आणि एमआयडीसी यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्या सोडवण्याबरोबरच आगामी काळात समस्या टाळण्यासाठी उपाययोजना यावर चर्चा करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, प्रशासकीय अधिकारी, नागरिक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...