खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या ,’ मी स्वतः महिन्यातून दोन वेळा हिंजवडीला भेट देऊन कामाची पाहणी करणार असून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि सरकार आम्ही एकत्र येऊन हिंजवडी परिसरातील अडचणी सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. हिंजवडी आणि परिसरातील विकास कामे आणि देखरेखीसाठी एक सक्षम व्यवस्था असणे गरजेचे आहे, त्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी केली आहे . तसेच मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांची एकत्रित बैठक घेऊन हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे. या समस्यांबाबत आपण ८ जुलैला उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहे . हिंजवडीतील नाले सफाई, राडारोडा आणि अतिक्रमणविरोधी कारवाई ही कामे २६ जुलैपर्यंत झाल्यास अधिकाऱ्यांचा सत्कार करु पण कामे न झाल्यास आम्ही आंदोलन करणार असल्याचे सांगितले. हिंजवडी परिसरातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे वेळ आहे. शाळांच्या वेळेत थोडासा बदल केल्यास ट्राफिक कमी करण्यास मदत होईल का याबाबत आपण शाळांची चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बंगरुळूचे खासदार पी.सी मोहनजी यांनी तिथल्या कंपन्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याशी संपर्क साधून त्या पद्धतीने आपणही पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. महत्वाचे म्हणजे आपण विरोधी पक्षात असलो तर समस्या सोडवण्यासाठी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचे आवर्जून सांगितले.-
पुणे-ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रात मोठे योगदान दिले आहे. ठाकरे हे फक्त एक नाव नाही, तर एक ब्रँड आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य एकत्र आले, तर त्यांचे मनापासून स्वागत करू. कोणतीही गोष्ट मनापासून केली पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमीलनावर शुक्रवारी भाष्य केले.

खासदार सुप्रिया सुळे शुक्रवार सकाळपासून हिंजवडी आयटी पार्कसह माण मारुंजी परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या समस्येची पाहणी केली. त्यानंतर त्या बोलत होत्या. सुळे यांनी 26 जुलैपर्यंत हिंजवडीतील रस्ते दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला अल्टीमेटमदेखील दिला आहे. सुळे म्हणाल्या, की 26 जुलैपर्यंत परिस्थिती सुधारली पाहिजे. अन्यथा, आमचा नाईलाज होईल. हिंजवडीचा विकास झाला पाहिजे. हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विलीन करण्याबाबत नागरिकांचे मत महत्त्वाचे आहे. वेळेत परिस्थिती सुधारली, तर हिंजवडीला येऊन संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करू, असेही त्यांनी सांगितले.
ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रात मोठे योगदान दिले आहे. ठाकरे हे फक्त एक नाव नाही, तर एक महत्त्वाचा ब्रँड आहे. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता ठाकरे आहे. त्यांनी मोठ्या श्रद्धेने शिवसेना बांधली आहे. त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य एकत्र आले तर त्यांचे मनापासून स्वागत केले जाते. कोणतीही गोष्ट मनापासून केली पाहिजे. यश आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देश आणि राज्यासाठी योगदान दिले आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्याचा उल्लेख केला जाईल. त्यांचे योगदान कोणीही संपवू शकत नाही, असे मतही सुळे यांनी नोंदवले. राज्यातील गुन्हेगारीला राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारमुळे राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी, माण, मारुंजी या भागाला भेट सुळे यांनी देऊन पाहणी केली. यावेळी हिंजवडी फेज-१ ते माण रस्ता, माण फेज-३ ते मेट्रो स्टेशन कारशेड रस्ता, माण फेज-३ ते मेगापोलीस रस्ता, भोईरवाडी रस्ता, हिंजवडी फेज-२ ते डोहेलर कंपनी रस्ता, हिंजवडी ते मारुंजी रस्ता टी जंक्शन या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ते मंजूर होऊनही ते रस्ते अद्याप झालेले नाहीत. पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहते. त्याचबरोबर या भागात वीज पुरवठा देखील सतत खंडित होत आहे. या भागात अनेक नवीन प्रकल्प सुरू असून त्यांच्याकडून नियमांचा भंग होत असल्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदूषण आणि इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रचंड त्रास आणि मनस्तापही सहन करावा लागत आहे. या भागातील वाहतुकीची समस्या देखील कायम आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक पायाभूत सुविधांची देखील दुरावस्था झालेली आहे. हिंजवडी येथे देशातील महत्वाचे आयटी पार्क असल्यामुळे येथे अनेक नामांकित कंपन्या आणि हजारो तज्ज्ञ इंजिनियर कार्यरत आहेतं त्यांना या समस्यांमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत लवकरच पुणे जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आणि एमआयडीसी यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्या सोडवण्याबरोबरच आगामी काळात समस्या टाळण्यासाठी उपाययोजना यावर चर्चा करण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, प्रशासकीय अधिकारी, नागरिक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

