Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राज-उद्धव मनोमिलनामागे फडणवीस यांचाच हात,ठाकरे एकत्र आले तर शिंदेंनाच मोठा फटका

Date:

जे ठाकरेंचे नाही राहिले ते फडणविसांचे काय राहणार ?

मुंबई-

इम्तियाज जलील आज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येत आहेत. त्यांच्या एकत्र येण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. फडणवीस यांना माहिती आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी केव्हाही त्यांची साथ सोडू शकतात. जे उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊ शकतात, ते उद्या इतर कुणी ऑफर दिली तर त्यांच्यासोबतही जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याची चाल खेळली आहे.

इम्तियाज जलील यांनी यावेळी मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बसणार असल्याचाही दावा केला. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा फटका बसेल. सध्या मराठी माणसांना जे हवे आहे, तेच होत आहे. आम्ही विरोधात असूनही शिवसेना ही मराठी माणसाची ताकद आहे हे मान्य करतो, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाद्वारे एमआयएम भविष्यात महाविकास आघाडीशी आघाडी करण्याचे संकेत मिळत आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा दावा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी दगाफटका करू शकतात अशी भीती देवेंद्र फडणवीस यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी राज व उद्धव यांना एकत्र आणण्याचा प्लॅन आखला आहे, असे ते म्हणालेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे सद्यस्थितीत मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यानंतरही वातावरण शांत झाले नाही. आता उद्या शनिवारी मुंबईत राज व उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याद्वारे हे दोन्ही बंधू एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यांची ही एकी पुढील सर्वच निवडणुकांत दिसून येण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...