अनिल अंबानींच्या कंपनीवर एसबीआयची मोठी कारवाई-31,580 कोटी कर्ज फ्रॉड घोषित

Date:

कंपनी-संचालकांवर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई शक्य, सीबीआय-पोलिस केसही:स्टेट बँक २१ दिवसांच्या आत ही फसवणूक रिझर्व्ह बँकेकडे अहवाल स्वरूपात सादर करेल. नंतर प्रकरण सीबीआय किंवा पोलिसांकडे दिले जाईल. त्यानंतरची कारवाई रिझर्व्ह बँक करेल.

मुंबई-उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या कर्ज खात्याला स्टेट बँक ऑफ इंडिया ‘घोटाळा’ म्हणून घोषित करणार आहे. बँकेने कंपनीचे माजी संचालक अनिल अंबानी यांचे नाव रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) कळवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ३१,५८० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. आरकॉमने शेअर बाजाराला सांगितले की त्यांना एसबीआयकडून २३ जून २०२५ रोजी हे पत्र मिळाले.एसबीआयने म्हटले की, आरकॉमने कर्जाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. रकमेचे संशयास्पद हस्तांतरण आढळले. कर्जाचा मोठा भाग अनधिकृत कामासाठी वापरला होता. हे कर्ज ऑगस्ट २०१६ पूर्वीचे आहे. १० नोव्हेंबर २०२० रोजी एसबीआयनेही कंपनीचे खाते फसवणूक म्हणून घोषित केले. सुप्रीम कोर्टाने २७ मार्च २०२३ रोजी ते रद्द केले. डिसेंबर २०२३ मध्ये, बँकेने पुन्हा कारवाई सुरू केली. एखादी बँक एखाद्या खात्याला घोटाळा म्हणून घोषित करते, तेव्हा त्याची माहिती २१ दिवसांत आरबीआयला द्यावी लागते.

कंपनी आणि तिच्या संचालकांना पुढील पाच वर्षांपर्यंत बँका, आर्थिक संस्था किंवा निधीपुरवठा करणाऱ्या अन्य संस्था कर्ज देणार नाहीत. कंपनीने फसवणुकीची रक्कम परत केली, तर कर्जयोग्यतेची पत परत मिळू शकते.

कंपनी व संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकते.नादारी आणि दिवाळखोरी प्रक्रिया कायदा २०१६ नुसार आधीच दिवाळखोरीत आहे. मात्र फसवणुकीचे प्रकार ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचे असल्याने फौजदारी कारवाई शक्य आहे. रिझर्व्ह बँकेचे २०१६ मधील परिपत्रक यासंदर्भात मार्गदर्शन करते. अशाच प्रकारच्या प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरोधात कारवाई झाली होती.

अनिल अंबानी यांच्या वकिलाने एसबीआयच्या निर्णयाला एकतर्फी आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन म्हटले आहे. वकिलाने म्हटले की, हे सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टाचे निर्णय आणि आरबीआयच्या निर्देशांच्या विरुद्ध आहे. ही नोटीस अवैध आहे.

आरएचएफमधून निधी वळवल्याबद्दल सेबीने अनिलना २०२४ ते २०२९ पर्यंत बाजारात व्यापार करण्यास बंदी घातली आहे. २०२० मध्ये त्यांनी यूकेच्या न्यायालयात स्वतःला दिवाळखोर घोषित केले. आरकॉमचा चिनी बँकांकडून ७,७०० कोटी रुपयांचा कर्जाचा खटला हरल्यानंतर त्यांनी असे केले.​​​​​​​

एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या रांगेत ६ व्या क्रमांकावर असलेल्या अनिल अंबानींवर देश-विदेशात पैैसे वळवणे, बनावट हमी, कर्ज थकबाकी आदी आरोप आहेत. आरकॉम दिवाळखोरीच्या प्रक्रियेत आहे. कंपनीवर ४०,४१३ कोटींचे कर्ज (व्याजासह ७० हजार कोटी रु.) थकीत आहे. बीएसईनुसार रिलायन्स एडीए समूहाच्या चार सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४४,५९६ कोटी रुपये आहे. तथापि, रिलायन्सने २०२५ मध्ये ८०० कोटी रु. आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने ३३०० कोटींचे कर्ज चुकते करून स्टँडअलोन कर्जमुक्तीचा दावाही केला आहे.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अलीकडेच फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन कंपनीसोबत भारतात फाल्कन २००० जेट विमाने निर्मितीसाठी भागिदारी केली आहे. दसॉल्टने २०२८ पर्यंत भारतात निर्मिती झालेल्या पहिल्या फाल्कन विमानाची डिलिव्हरी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...