नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात 3 महिन्यांत 767 शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त आणि सरकार गप्प,शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही अन मित्रांना हजारो कोटीची माफी अशा शब्दात मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असून यात ते म्हटले की, महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी सरकारला प्रश्नार्थक पद्धतीने विचारले की, हा फक्त एक आकडा आहे का? यावेळी राहुल गांधींनी कर्जमाफी बाबतही सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा फक्त एक आकडा आहे का? नाही. ही 767 उध्वस्त घरे आहेत. 767 कुटुंबे कधीही सावरू शकणार नाहीत आणि सरकार गप्प आहे. ते दुर्लक्षित पणे पाहत आहे. शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे, खते आणि डिझेल महाग आहेत पण सरकारी एमएसपीची हमी नाही. जोपर्यंत शेतकरी कर्जमाफीची मागणी करत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.
उद्योजकांच्या कर्ज माफीवरून राहुल गांधींनी सरकारवरही निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, आजच्या बातम्या पहा, अनिल अंबानींचा 48000 कोटी रुपयांचा एसबीआय घोटाळा. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबद्दल बोलले होते पण आज परिस्थिती अशी आहे की अन्नदात्याचे आयुष्य अर्धे होत चालले आहे. ही व्यवस्था शांतपणे शेतकऱ्यांना मारत आहे. पण मोदीजी स्वतःच्या जनसंपर्काचा तमाशा पाहत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन 6 महिने उलटूनही सरकारला हे आश्वासन पूर्ण करता आलेले नाही. मात्र, या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, कर्जमाफीच्या सरकारच्या घोषणेची वाट पाहण्याऐवजी शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक कर्जाचे हप्ते वेळेवर भरावेत. त्याच वेळी, एकनाथ शिंदे म्हणाले की, जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याबाबत सरकार सतर्क आहे. केवळ कर्जमाफीच नाही तर प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल.

