मुंबई- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधान व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. काल या प्रकरणी काँग्रेस सदस्य नाना पटोले यांचे दिवसभरासाठी निलंबन झाले होते. त्यानंतर विरोधकांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता. या प्रकरणी आजही विरोधक सरकारला धारेवर धरले.
भाजपचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केली. या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्याने लोणीकर यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले. मी जे बोललो नाही ते मी बोललो हा आरोप केला.ह्यात राजकारण आहे असा दावा बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत केला. महाविकास आघाडीने तेव्हा आक्षेप घेतला व जोरदार घोषणाबाजी केली.बबनराव लोणीकर विधानसभेत बोलताना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, दोन दिवस माझ्या नावाचा उल्लेख केला जात आहे. हा माझा हरकतीचा मुद्दा आहे. जे मी आयुष्यात कधी बोललो नाही. 40 वर्ष मी राजकारणात आहे. मी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्याचे म्हटले जात आहे. पण मी असे काही बोललोच नाही. काही लोक राजकारण करत आहेत. माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे. मी शेतकऱ्यांची एक हजार वेळा माफी मागेल, पण मी यांची माफी मागणार नाही. मी शेतकऱ्यांसाठी 40 वर्ष लढलो आहे.

