Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अंतराळ औषधोपचार ते डीएनए लस: ‘विकसित भारत 2047’ साठी एकत्रित, सर्वसमावेशक आरोग्य मॉडेल आवश्यक – डॉ. जितेंद्र सिंह

Date:

मुंबई-भारत आरोग्य-तंत्रज्ञान (health-tech) क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा असून  एका नव्या अध्यायाची सुरूवात होत असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.ईटी टाइम्स नाऊने आयोजित केलेल्या ‘डॉक्टर्स डे परिषदे’मध्ये विचारांना चालना देणारे बीजभाषण त्यांनी केले. डॉ. जितेंद्र सिंह हे स्वतः एक प्रख्यात वैद्यकीय प्राध्यापक आणि मधुमेह तज्ञ आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेने जागतिक स्तरावर दहाव्या क्रमांकावरून चौथ्या स्थानावरून झेप घेतली आहे आणि भारताची शिखराच्या दिशेने वाटचाल सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रगतीत आरोग्य-तंत्रज्ञान क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असेल, असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेचा उल्लेख केला, ज्यात त्यांनी स्वदेशी जीवशास्त्र संच नेले आहेत. ही मोहीम एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, यामुळे लवकरच ‘अंतराळ औषधोपचार’ (Space Medicine) या नव्या वैद्यकीय शाखेचा जन्म होऊ शकतो, असे मंत्र्यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी विकसित भारत @2047 च्या संकल्पनेनुसार ” परस्पर समन्वय असलेली, सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी आरोग्य सेवा प्रणाली’’ निर्माण करण्याचे आवाहन केले.

“लवकरच, आपल्याकडे वैद्यकीय शिक्षणामध्ये ‘अंतराळ चिकित्सक’ (Space Physicians) नावाची एक समर्पित शाखा असू शकते. या भविष्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे,” असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

आरोग्य आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या विषयावर बोलताना, मंत्र्यांनी नमूद केले की भारतासमोर “द्वि-स्तरीय आव्हान” (bi-phasic challenge) आहे. एका बाजूला वाढत्या आयुर्मानामुळे वृद्ध नागरिकांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे युवा लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारत सध्या आजाराच्या दुहेरी ओझ्याशी लढत आहे, विशेषत: कोविड-पश्चात काळात संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा दोन्ही आजारांशी एकाच वेळी मुकाबला करत आहे. यावर मात करण्यासाठी, त्यांनी मोठ्या प्रमाणावर तपासणी, लवकर निदान  आणि प्रतिबंधात्मक उपायांवर  भर दिला. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारी वाढवण्याचे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, टेलीमेडिसिन आणि मशीन लर्निंग  सारख्या तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करण्याचे आवाहन केले.

भारताच्या अलीकडील जागतिक यशांवर प्रकाश टाकताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी अभिमानाने सांगितले की, प्रतिबंधात्मक आणि अचूक आरोग्यसेवेत भारत जागतिक नेता म्हणून उदयाला आला आहे. मंत्र्यांनी नॅफिथ्रोमायसिन (Nafithromycin) या देशातील पहिल्या स्वदेशी विकसित प्रतिजैविक रेणूच्या निर्मितीप्रारंभाची घोषणा केली, जी भारताच्या औषधनिर्मितीतील नवोन्मेषामध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी या यशाचे श्रेय खाजगी उद्योगासोबतच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सहकार्याला दिले. ते म्हणाले, “हे यश सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या सुरुवातीपासूनच अखंड एकीकरणामुळे  शक्य झाले.”

आपल्या भाषणाचा समारोप करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या आरोग्यसेवेच्या भविष्यासाठी परिवर्तनकारी दृष्टिकोन आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित करत या क्षेत्रांमध्ये व्यापक समन्वयाचे आवाहन केले. शाश्वतता आणि व्याप्ती सुनिश्चित करण्यासाठी संशोधन आणि आरोग्य सेवा वितरण या दोन्हीमध्ये खाजगी क्षेत्राच्या सुरुवातीच्या टप्प्यातील एकीकरणाची त्यांनी पुरस्कार केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर

छत्रपती  शिवाजी महाराजांच्या  स्वराज्य उभारणीत  त्यांच्या  तेजस्वी पराक्रमासोबत  त्यांचे ...

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला

पुणे-येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला...

मनीष रायते ठरला मुळशी केसरी २०२५चा मानकरी

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक...

Pcmc आयुक्त हेही युती सरकारच्या प्रचार मोहिमेचे प्यादे ? आप चा थेट प्रहार

आजचे लाभार्थी कंत्राटदार हे भाजपचे देणगीदार आहेत की सरकारच...