८२४० सफाई कर्मचारी,१६०८ शौचालये,अन् ५०० शाळातून योगा व आरोग्य शिबिरे राबवत महापालिकेने केली वारकऱ्यांची सेवा,२५७ टन कचऱ्याची लावली विल्हेवाट 

Date:

पुणे: ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात विठू माऊली ची ओढ लागलेल्या श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री.संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात काल दाखल झाल्यावर महापालिकेच्या ८२४० सफाई कर्मचारी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छता,आरोग्य यांची पालखी जणू खांद्यावर घेतली आणि पुण्यातून २५७ टन कचऱ्याची विल्हेवाट लावली.५०० शाळातून वारकऱ्यांसाठी शिबिरे घेतली,पाऊस अस्वच्छता यापासून त्यांच्या रक्षणासाठी महापालिकेने जिवाचे रान केल्याचे दिसले.

आषाढी पालखी सोहळा पुणे मार्गे पंढरपूर येथे मार्गस्थ होत आहे.या दरम्यान दोन्ही पालख्यांचा पुणे शहरात मुक्काम आहे.दि.२० जून रोजी दोन्ही पालख्यांचे पुणे शहरात आगमन झाले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम,अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी,घनकचरा व व्यवस्थापनचे उपायुक्त संदीप कदम,उपायुक्त माधव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले.दोन्ही पालख्यांच्या मुक्कामा दरम्यान पुणे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता आणि आरोग्य यावर भर देत कार्यवाही करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडणकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आले. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात आले. क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण पालखी मार्गावर प्रत्येकी ५० मी.अंतरावर कचरा संकलनकरिता बकेटची व्यवस्था करण्यात आली. सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत पालखी कालावधीमध्ये ८० लिटर क्षमतेचे एकूण ६८५ बकेट व ३१ तात्पुरत्या कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले.

पुणे शहरात येणा-या वारक-यांच्या सोयीसाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार पोर्टेबल व फिरते शौचालय पुरविण्यात आले. तसेच सदरच्या शौचालयांची मनपा सेवकांमार्फत व सबंधित यंत्रानेद्वारे दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात आली. प्रत्येकी १६०८ पोर्टेबल शौचालयांची सोय वारक-यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. सार्वजनिक रस्त्यावर,वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आवश्यकतेनुसार सार्वजनिक ठिकाणी कीटकनाशक,दुर्गंधीनाशक औषध फवारणी करण्यात आली.याकरीता घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडून ६७५० किलो जंतुनाशक पावडर व १००० लिटर जंतुनाशक लिकविड पुरविण्यात आले.पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी जेटिंग मशीनद्वारे सा र्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली.

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दोनही पालखी मुक्कामाग असल्यामुळे व तेथे वारक-यांची संख्या जास्त असल्यामुळे भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साफ सफाईचे व स्वच्छतेची कामे होणे करीता अन्य क्षेत्रिय कार्यालयाकडून ६० अतिरिक्त सेवकांची नेमणूक करण्यात आली. वारकरी मुक्कामास असलेल्या शाळांमध्ये तीन पाळ्यांमध्ये महिला वारक-यांसाठी शौचालय व अंघोळीसाठी सोय करण्यात आली.पालखी कालावधीमध्ये पुणे महानगरपालिका व पेंडकेअर संस्थेमार्फत महिलांकरीता एकूण ४५००० सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध करून त्याचे वाटप करण्यात आले.स्त्रीरोग तज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्यात आले. ८२४० सफाई कर्मचारी पालखी कालावधीमध्ये शहरातील स्वच्छतेसाठी कार्यरत होते. 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त वारक-यांसाठी शहरातील ५०० विविध शाळा महाविद्यालयांमध्ये योग कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.या सर्व शाळांमध्ये महानगरपालिकेच्या सफाई कर्मचायांमार्फत स्वच्छता विषयक कामकाज करण्यात आले. दि. २२ जून रोजी पालखी मार्गस्थ झाल्यानंतर मुक्काम असलेल्या सर्व शाळा,धर्मशाळा,मंदिरे व पालखी मार्ग या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. बारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म,जाती,पंथ,लिंग या पलीकडे जाऊन सर्व ममावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे.आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देह आळंदी/ पंढरपूर येथे दाखल होत असतात. या बारकत्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते.या अनुषंगाने मागील तीन वर्षांपासून ‘आरोग्यवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आरोग्यवारीच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यानुसार स्थानिक प्रशासन व पोलीस यांच्या मदतीने सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

आरोग्य वारीमध्ये पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

१) वारी काळात दर दहा ते वीस कि. मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आली.
२) मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून ४५००० सॅनिटरी नॅपकीन्सचे वाटप करण्यात आले.
३) स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
४) महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्यात आले.
५) पालखी कालावधीमध्ये स्वच्छतेच्या संबंधित पाहणी करण्यागाठी व तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक मुकादम व सफाई सेवक यांची QRT टीम तयार करण्यात आली.


संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी निमित्त निवडुंग्या विठोबा मंदिर या ठिकाणी आरोग्य वारीच्या उद्घाटनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आरोग्य वारीच्या कार्यक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षा दिपा मुधोळ मुंडे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदिप कदम,माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...