पुणे – आरआर काबिल या कंपनीच्या “रोशनी”(RRoshani) या उपक्रमाने अलिकडेच पुणे शहरातील दोन शाळांमध्ये
विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची पावले
उचलली. विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत त्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती
उंचावणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्वच्छ पाण्याला प्राधान्य देऊन, हा प्रकल्प आरोग्यपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण
करत असून विद्यार्थ्यांना अधिक चांगले आरोग्य आणि शैक्षणिक अनुभव मिळावेत यासाठी चालना देत आहे.
निरंजन सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने “रोशनी”(RRoshani) टीमने पुण्यातील नवीन मराठी शाळा आणि मुक्तांगण शाळा
येथे आरओ (RO) पाण्याची शुद्धीकरण यंत्रे बसवली आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून आता दररोज 3,000 हून अधिक
विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. त्यामुळे शाळांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबाबत सुधारणा झाली आहे.
आरआर काबिलच्या संचालिका किर्ती काबरा म्हणाल्या, “स्वच्छ पाणी ही केवळ मूलभूत गरज नाही, तर तो प्रत्येकाचा हक्क
आहे असे आरआर काबिल मध्ये आम्ही मानतो. “रोशनी”(RRoshani) उपक्रमाद्वारे आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि
स्वास्थ्य यामध्ये हातभार लावता येत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. या उपक्रमामुळे त्यांना सुरक्षित आणि सहायक
शैक्षणिक वातावरणात पुढे जाण्याची संधी मिळते.”
राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत “रोशनी”(RRoshani) चा हा उपक्रम आरोग्य, स्वच्छता व शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये
सुधारणा करतो आहे. जलजन्य आजारांमध्ये घट, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ आणि शैक्षणिक गुणवत्ता यामध्ये
सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आरआर काबिल फाऊंडेशनच्या “रोशनी”(RRoshani) उपक्रमामार्फत देशात शिक्षण,
आरोग्य, शाश्वतता आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत प्रभावी प्रकल्प राबवण्यात येत आहेत.

