हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्याने शनिशिंगणापूर देवस्थानने 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह 167 जणांना दिला नारळ

Date:

अहिल्यानगर- जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या 167 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यात 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी नुकतीच या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे देवस्थानने या भगव्या संघटनांच्या दबावामुळे ही कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे.मंत्री नीतेश राणे यांनीही हकालपट्टीची मागणी केली होती.नीतेश राणे यांच्या या भूमिकेमुळे शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावरील दबाव वाढला होता. त्यामुळे त्यांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून या वादातून स्वतःची सुटका करून घेतली, असा आरोप केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात विख्यात असणाऱ्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी गत 21 मे रोजी कथितपणे मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर जाऊन ग्रिल बसवले होते. तसेच तेथील स्वच्छता व रंगरंगोटीही केली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेत या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. तसेच या प्रकरणी 14 जून रोजी मंदिराबाहेर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केले, पण त्याचवेळी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची नियुक्ती मंदिराच्या मुख्य चौथऱ्यावर किंवा गर्भगृहात करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.

हे कर्मचारी मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन व शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. 99 कर्मचारी मागील 5 महिन्यांपासून नोकरीवर अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचाही पगार बंद करण्यात आला आहे. उर्वरित 15 कर्मचारी अनेक वर्षांपासून ट्रस्टला आपली सेवा देत आहेत. यातील काहींचा अनुभव 20 वर्षांहून अधिकचा आहे, असे विश्वस्त मंडळाने म्हटले होते. पण या प्रकरणी देवस्थानवरील दबाव वाढल्यानंतर अखेर त्यांनी 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकूण 167 जणांना कामावरून कमी केले. या सर्वांवर अनियमितता व शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी गुरूवारीच हिंदू संघटनांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची केलेली मागणी योग्यच असल्याचे विधान केले होते. हिंदू संघटनांनी केलेली मागणी योग्यच आहे. हाजी अली आणि अजमेर दर्ग्यात कृत्य कुणी करेल का? असे कृत्य फक्त आपल्या हिंदू धार्मिक स्थळांसोबतच का केले जाते? कोणताही हिंदू व्यक्ती कोणत्याही मुस्लिम धार्मिक स्थळात काम करताना दिसला तर हे लोक त्याला नक्कीच सोडणार नाहीत. परंतु, ज्या प्रकारे आपल्या हिंदू धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेशी सतत छेडछाड केली जात आहे, ते आपण आता कोणत्याही किंमतीत स्वीकारू शकत नाही. कोणत्याही मुस्लिम संस्थेत तुम्हाला कोणताही हिंदू काम करताना दिसणार नाही, असे ते म्हणाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...