ज्याला त्याला आपापल्या कर्तुत्वावर निवडून येऊ द्यात
प्रभाग पद्धतीने मतदार संभ्रमात .. आणि मतदारांचा निवडणुकी नंतर फुटबॉल
मुंबई प्रमाणेच अन्य महापालिकांच्या निवडणुका व्हाव्यात
पुणे-प्रभाग रचना लोकहिताची नव्हे तर राजकारण्यांच्या हिताची आहे राज्य सरकारने पुण्यात एक वार्ड एक नगसेवक पद्धती राबवली पाहिजे जी लोकहिताची आहे जर जास्त प्रभाग पद्धती पुण्यात राबविली तर ती भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणार आहे असा जनमताचा सूर असताना आता याच पार्श्वभूमीवर पुण्यातही मुंबई प्रमाणेच एक सदस्यीय प्रभाग रचना व्हावी. जर चार सदस्यीय प्रभाग रचना आमच्यावर लादली तर आम्ही या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाऊ, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे. तसेच पुण्यातील कॉंग्रेस पक्षाने देखील या चार सदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला आहे.
पुण्यातील चार सदस्यीय प्रभाग रचना लादली गेली तर या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी यांनी दिला आहे. तसेच चार सदस्यीय प्रभाग हे महानगरपालिकेमध्ये योग्य नाही. त्याच्या बदल्यात एक सदस्यीय प्रभाग केला पाहिजे. असे केल्यास नगरसेवकाला नीट काम करता येते. भारतीय जनता पक्षाला फक्त सत्ता भोगायची आहे. नागरिकांच्या समस्यांवर त्यांना काम करायचे नाही. आमचा या निर्णयाला विरोध आहे. भारतीय जनता पार्टी मात्र नेहमीप्रमाणे यावेळीही रडीचा डाव खेळणार, अशी टीका काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात मुंबई वगळता इतर ठिकाणी बहूसदस्यीय प्रभाग आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात पुणे, नागपूर ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे.
पुण्यात 162 नगरसेवक असणार आहेत, त्यानुसार प्रभाग रचना केली जाणार आहेत. तर मुंबई महापालिकेत जुनेच 227 प्रभाग कायम असून त्या ठिकाणी एक सदस्यीय प्रभाग असणार आहे. तसेच राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीन ते चार सदस्यीय प्रभाग असणार आहेत. पुण्यामध्येही बहुसदस्यीय प्रभाग असणार आहेत.
ड वर्गातील महापालिकेत प्रभाग रचना ठरवताना सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत. परंतु जर सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन किंवा पाच सदस्यांचा होईल. ड वर्ग महापालिकांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे.
अ वर्ग महापालिकांमध्ये पुणे आणि नागपूर महापालिकांचा समावेश होतो. ब वर्ग महापालिकेत ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या महापालिका येतात तर क वर्ग महापालिकेत नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली यांचा समावेश होतो.

