मुंबई-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठित चिनाब रेल्वे पुलावर तिरंगा ध्वज फडकवण्याचा आनंद व्यक्त केला. हा क्षण राष्ट्रीय अभिमानाचा आणि सर्वात आव्हानात्मक भूभागात अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचा दाखला असल्याचे म्हटले आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“चिनाब रेल्वे पुलावर तिरंगा ध्वज दिमाखात फडकत आहे !
हा पूल महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणीचे चे उत्कृष्ट मिश्रण असून, सर्वात आव्हानात्मक प्रदेशात अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याची भारताची वाढती क्षमता प्रतिबिंबित करतो, ही अत्यंत अभिमानाची भावना आहे.”

