नाशिक : मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये परशुराम भवनाचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संपूर्ण इतिहासात कोणतंही क्षेत्र काढा, त्यात चित्पावन समाजाची लोक दिसतात.स्वातंत्र्य चळवळ, कला आणि साहित्य क्षेत्रातील १० मोठी नावं काढली तरी त्यात ३ ते ४ चित्पावन ब्राह्मण समाजाची असतात.
परशुराम भवन ही सुंदर वास्तू बांधली याबद्दल मी चित्पावन ब्राह्मण संघाचं अभिनंदन करतो. त्याची उद्घाटन करण्याची संधी मला दिलीत त्यासाठी तुमचे आभार. इथं ४० मुलांसाठी हॉस्टेल उभारलंय. एनडीए किंवा इथर परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे. या सामाजिक उपक्रमांसाठी मी आभार मानतो असंही मुख्यमंत्री म्हणाले.
एखादी सामाजिक संघटना ९३ वर्षे सातत्यानं काम करते. विविध प्रकल्पाच्या माध्यमातून समाजाला एकत्र ठेवते आणि गरजूंना मदत करते अशी कमी उदाहरण दिसतात असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
ब्राह्मण समाजाच्या संख्येबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास पाहता कोणतंही क्षेत्र बघा त्यात अग्रणी चित्पावन ब्राह्मण समाजाचे लोक बघायला मिळतील. हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असतो. स्वातंत्र्य लढा, सामाजिक सुधारणा, कला, साहित्य या कोणत्याही क्षेत्रात १० ठळक नावं काढली तर त्यात ३ ते ४ नावं चित्पावन ब्राह्मण समाजाची बघायला मिळतात.
अतिशय बुद्धिमान आणि मेहनती असा आपला ब्राह्मण समाज आहे. विषम परिस्थितीतून वर आलेला असा हा समाज सामान्य, मध्यमवर्गीय आणि गरीब असूनही स्वत:च्या कर्तृत्वाने पुढे आलेले लोक बघायला मिळतात असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, जात कधी जात नसते. जातीय व्यवस्था असू म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असं म्हणणं समर्पक ठरेल. विषमता दूर करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. राजकीय क्षेत्रात संख्या महत्त्वाची असते. ब्राह्मणांची संख्या बोटावर मोजण्यासारखी असते पण दुधात साखरेचं काम करणं हे ब्राह्मण समाजाचं काम आहे. साखर चिमूटभर असते पण दुधात टाकली की दूध गोड लागतं. साखरेसारखा गोडवा समाजात कसा निर्माण करता येईल हे आपल्याला करायचंय.
ब्राह्मणांची संख्या बोटावर मोजण्याइतकी पण कोणतंही क्षेत्र घ्या….; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले..
Date:

