पुणे-
केंद्रीय लाेकसेवा अायाेग मार्फेत (युपीएस्सी) घेण्यात येणाऱ्या भारतीय सनदी सेवा परीक्षेच्या निवडीवेळी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी कार्मिक अाणि प्रशिक्षण विभाग (डीअाेपीटी) यांच्याकडे केली हाेती. त्यानुसार भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाने २०१५ ते २०२३ दरम्यान सिव्हिल सेवा परीक्षेत सहभागी झालेल्या काही उमेदवारांनी राखीव प्रर्वगासाठी बाेगस प्रमाणपत्रांचा वापर केल्याच्या अाराेपींचा चाैकशी सुरु केल्याची माहिती कुंभार यांनी दिली अाहे. या चाैकशीत ११ अायएएस, दाेन अायपीएस, एक अायएफएस व एक अायअारएसचा समावेश अाहे.
कुंभार म्हणाले, माझ्या तक्रारीत आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस०, दिव्यांग (पीडब्ल्यूबीडी), इतर मागसवर्गीय, नाॅन क्रिमिलेअर (ओबीसी-एनसीएल), अनूसूचित जाती (एससी), अनूसुचित जमाती (एसटी) प्रवर्गताील सवलती मिळवण्यासाठी सादर केलेल्या संशयास्पद प्रमाणपत्रांचा उल्लेख अाह. युपीएससी मार्फत प्राप्त झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करत डीओपीटीने अनेक राज्य सरकारांना आणत्र केंद्र सरकारच्या मंत्रालयांना संबंधित उमेदवारांचे प्रमाणपत्र तपासण्याचे निर्देश दिले अाहे. यामध्ये राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाणा, अाेडिशा, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, केरळ, तसेच गृहमंत्रालय, महसूल विभाग अाणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांची कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात अाली अाहे. डीअाेपीटीने प्राथमिक स्तरावर तपासणी पूर्ण केल्याचे दिसते व त्यानंतरच ही विस्तृत चाैकशी सुरु करण्यात अाली अाहे. त्यांनी केवळ प्रमाणपत्रांचे वैधता तपासणीचीच नाही तर प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत टिप्पणीही मागवलेल्या अाहे.
तपासणीसाठी २२ उमेदवारांची यादी मी दिली हाेती त्यातील १५ उमेदवारांबाबत अधिकृत कारवाई सुरु अाहे. सिव्हील सेवा भरती प्रक्रियेत राखीव प्रवर्गातील सवलतींचा अनाधिकृत वापर केल्यास अधिकृत अाणि प्रामणिक उमेदवारांच्या हक्कांचे उल्लंघन हाेते अाणि खऱ्या गरजू उमेदवारांवर अन्याय हाेताे. ईडब्ल्यूएस प्रवर्ग विशेषत: उत्पन्न अाणि मालमत्तेच्या माहिती मधील अस्पष्टतेमुळे त्याचा गैरवापर अधिक हाेत असताे. २०२४ मध्ये बनावट प्रमाणपत्र वापरल्याप्रकरणी अायएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सेवेतून बडतर्फे करण्यात अाले हाेते हे उदाहरणच व्यवस्थेतील त्रृटी स्पष्ट करते. सद्यस्थितीत चालू असलेली चाैकशीतील प्रकाराने ही केवळ अपवादात्मक नाहीतर एका व्यवस्थात्मक अपयशाचा परिणाम असल्याचे जाणवते. याबाबत मूलभूत सुधारणा पुढील काळात अावश्यक अाहे.

