देहू-आळंदी रस्त्यावर इंडसइंड बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न:हरियाणा टोळीतील दोन आरोपी ताब्यात, तीन फरार

Date:

पुणे-देहू – आळंदी रस्त्यावर देहुगाव मुख्य कमानीच्या पुढे रस्त्यावर थ्री एटीएम नावाने परिचीत असलेल्या इंडसाइंड बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने मंगळवारी मध्यरात्री पावणेदाेन वाजता फाेडण्याचे तयारीत असलेले पाच संशयित गस्त घालणाऱ्या पाेलिसांना दिसून आले हाेते. पाेलिसांनी सदर ठिकाणी जाऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तीन चाेरटे पसार झाले, तर दाेन आराेपींना अटक करण्यात यश आले. पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत संबंधित टाेळी ही हरियाणा राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड परिमंडळ दाेनचे पाेलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.

या प्रकरणी मुस्तफा माेबीन खान (वय- ३०),मुस्तकीम माेबीन खान (२५, दाेघे रा. पिनागव्वान, ता.पुन्हाना, जि.नुह, हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार सिमा युसूफ खान (४०), वारीस खान (२०) व युसुफचा भाऊ आझाद खान (४५) हे कार मधून पसार झाले. सदर टाेळीचा म्हाेरक्या हा युसुफ खान असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील दाेन महिन्यापूर्वी विठ्ठलवाडी देहूगाव येथील एसबीआय बँकेचे एटीएम फाेडून १६ लाख ८७ हजार रुपये चाेरट्यांनी पळवून नेले हाेते. या एटीएम चाेरी प्रकाराचे अनुषंगाने पाेलिसांनी पुन्हा एटीएम चाेरीचा प्रकार घडू नये याकरिता परिणामकारक रात्रगस्त सुरु केली हाेती.

या दरम्यान देहुगाव बीट मार्शल रात्रगस्त घालताना त्यांना देहुगाव येथे एक पांढऱ्या रंगाची कार अभी असल्याचे दिसून आले. पाेलिस अंमलदार समाधान पटावकर व पाेलिस शिपाई किरण पाटील यांनी सदर गाडीकडे जाऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, सदरची कार ही तेथून भरधाव वेगाने आळंदीच्या दिशेने निघून गेली. त्यावेळी सदरच्या कारमध्ये पुढील बाजूस दाेन पुरुष व मागे एक महिला बसल्याचे दिसून आले. बीट मार्शलवरील पाेलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ एटीएमकडे धाव घेतल्यावर इंडसइंड बँकेचे एटीएमचे शटर थाेडे उचकटलेले व त्यातून उजेड बाहेर दिसला.

तसेच आतील बाजूस काहीतरी सामान जमिनीवर पडल्यासारखा आवाज आल्याने त्यांना एटीएम चाेरीचा संशय आला. त्यामुळे पाेलिसांनी सहाय्यक पाेलिस निरीक्षक जाेएब शेख यांना फाेन करुन माहिती देत मदतीसाठी बाेलावले. एटीएमचे शटर उघडून आत प्रवेश केल्यावर दाेनजण गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमची ताेडफाेड करुन दराेडा टाकताना मिळून आले. पाेलिसांना पाहून त्यांनी जाेरजाेरात आरडाओरड करुन शिवीगाळ करत पाेलिसांच्या दिशेने दगडफेक केली. तसेच त्यांच्याशी झटापटही केली. थाेड्याचवेळात आणखी पाेलिस आल्याने सदर दाेन आराेपींना अटक करण्यात आली. आराेपींवर देहु राेड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...