पुण्यात मराठा समाजाच्या नेत्यांचा मोठ्ठा निर्णय:हुंडा घेणाऱ्या आणि महिलांचा छळ करणाऱ्या कुटुंबांवर बहिष्कारबाबत आचारसंहिता ठरवणार

Date:

पुणे- वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनी मोठी चळवळ सुरु केली आहे . या प्रकरणाने खळबळ माजली आहे. यानिमित्ताने लग्नात ज्या अनिष्ट प्रथा सुरु झाल्या, त्या बंद करण्याबाबतची चर्चा आणि काही निर्णय सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या एका बैठकीत झाले आहे. आगामी काळात पुणे शहरापुरती एक कार्यकारिणी निर्माण करुन व्यासपीठ तयार करण्याचे बैठकीत ठरवले गेले आहे.

शांताई हॉटेल मध्ये झालेल्या बैठकीत शहरातील प्रमुख लोकांनी कोणत्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे ठरवले आहे. हुंडासारखे प्रकार दिसले आणि महिलेचा छळ झाला तर संबंधित कुटुंबासोबत रोटी-बेटी व्यवहार बंद केला जावा .ज्या घरात अशा पध्दतीने लग्न होतात व मुलींना त्रास होतो त्याठिकाणी लग्न न करण्याचे ठरवण्यात येणार आहे. वेळेत लग्न लावणे, मान्यवर सत्कार रद्द करणे, लग्नात मान्यवर हे नवरदेव किंवा इतर पाहुणे यांना सोन्याची चैन, अंगठी, वाहनाच्या चाव्या देणार नाही. मर्यादीत लोकात, कमी खर्चात आणि वेळेत लग्न समारंभ पुढील काळात पार पाडणे आदी गोष्टीवर भर दिला जाणार आहे.यावेळी आमदार चेतन तुपे,अंकुश काकडे,राजलक्ष्मी भोसले,दत्ता धनकवडे, अरविंद शिंदे,माजी आमदार सुनील टिंगरे, प्रशांत जगताप, श्रीकांत शिरोळे, दत्ता बहिरट, कमल व्यवहारे,संजय बालगुडे ,विकास पासलकर ,राजेंद्र कोंढरे शाम मानकर उपस्थित होते.
बैठकीत अनेक वक्त्यांनी मते व्यक्त केली. शहरातील अनेक मातब्बर घराणी आहे त्यांना सोबत घेऊन समाजातील ज्या अनिष्ट प्रथा आहे त्या दूर करणे प्रयत्न करण्यात येतील. पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. पुणे शहराने नेतृत्व करुन मराठा समाजासोबत इतर समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी अनेक दिवस पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील.

समाजाच्या भितीपोटी लोक लग्न झालेल्या मुलींना पुन्हा माहेरी आणत नाही, परंतु आता समाज लग्न झालेल्या मुलींच्या पाठीशी राहील. मराठा समाजावर ज्याप्रकारे चिखलफेक केली जात आहे, ती चुकीची आहे. लग्नात जो बडेजावपणा केला जात आहे, तो बंद करण्यासाठी आज समाजाने पुढाकार घेतला आहे. राजेंद्र हगवणे कुटुंबात जे घडले त्याचे समर्थन कधी केले जाणार नाही. सुसंस्कृत समाजाला दिशा देण्याचे काम करुन चुकीच्या रुढी, परंपरा यांना छेद दिला जाईल. यापुढील काळात देखील वारंवार बैठका घेऊन नवीन आचारसंहिता तयार केली जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...