देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर पुण्यात असल्याने,शहरात स्वतंत्र हेलिपोर्ट तयार करणार – मुरलीधर मोहोळ

Date:

पुणे-देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर पुण्यात असल्याने, शहरात स्वतंत्र हेलिपोर्ट तयार करण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी एका ठिकाणी जागेची पाहिली आहे. याशिवाय, देशातील सर्वात मोठी एव्हिएशन गॅलरी देखील पुण्यात उभारण्यात येणार, असल्याची माहिती केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (दि. २६) पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,’पुण्याची हवाई वाहतूक क्षेत्रातील वाढती भूमिका लक्षात घेऊन आम्ही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करत आहोत. पुण्यात देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर असल्याने येथे स्वतंत्र हेलिपोर्टची नितांत गरज आहे, ज्यावर आम्ही काम सुरू केले आहे. त्याचबरोबर, देशातील सर्वात मोठी एव्हिएशन गॅलरी पुण्यात तयार करून आम्ही हवाई वाहतूक क्षेत्रातील भारताची प्रगती आणि भविष्यातील शक्यता दर्शवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मोहोळ यांनी काय काय सांगितले….

नवी मुंबई विमानतळ:- नवी मुंबई विमानतळ ऑगस्ट अखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत सुरू होईल.

पीएमपीएमएल बस: – पीएमपीसाठी १,००० बस मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, राज्य शासनाकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत लवकरात लवकर बस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण :- पुणे विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणासाठी ओएलएस सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार भूसंपादन करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात येणार असून, यासाठी सुमारे महिनाभर लागेल. धावपट्टी विस्तारीकरणानंतर पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढवण्यात येईल.

‘उडान यात्रा कॅफे’:- पुणे विमानतळावर सुरू करण्यात आलेल्या ‘उडान यात्रा कॅफे’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, मुंबईतील विमानतळावर देखील हा कॅफे सुरू करण्यात येणार आहे.

लहान विमानतळांचा विकास:- सोलापूर, अकोला, शिर्डी यांसारख्या छोट्या विमानतळांचा विकास करून ‘उडान’ योजनेअंतर्गत विमानसेवा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

नाशिक कुंभमेळा:- नाशिक कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक येणार असल्याने, त्या पार्श्वभूमीवर देखील विमानोड्डानांचे नियोजन करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...