पुणे – दौंड शहरात पावसाचा पहिला बळी गेला आहे. पावसामुळे भिंत कोसळून येथील ताराबाई विश्वचंद आहिर नामक एका 75 वर्षीय महिलेचा बळी गेला आहे. ही महिला दुकानात बसली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात पावसाने पहिला बळी घेतला आहे. पावसामुळे अंगावर घराची भिंत पडून एका 75 वर्षीय वृद्ध मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ताराबाई विश्वचंद आहिर असे मृत महिलेचे नाव आहे. ताराबाई एका दुकानात बसल्या होत्या. तेव्हा त्यांच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
दरम्यान, मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

