पुणे – जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात एका महिलेसह दोन मुलांचा मृतदेह आढळून आला आहे. अहिल्यानगर हायवेजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला तीन मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय. मृतदेह जास्त जळाले असल्यानं त्यांची ओळख पटवणं कठीण आहे.प्राथमिक अंदाजानुसार नवऱ्याने पत्नी आणि मुलांना जाळलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती समजताच रांजणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी तपास सुरू आहे. ही घटना कौटुंबिक वादातून घडली की अन्य कोणते कारण आहे? याचाही तपाक केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे.
महिला आणि तिच्या दोन मुलाला जाळून टाकलं असून मृतदेहांची ओळख पटलेली नाही. रांजणगाव खंडाळे हद्दीमध्ये या तिघांना आणण्यात आलं. त्यांच्यावरती पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आलं. मात्र पावसामुळे ते न पेटल्याने तिघांचेही मृतदेह तसेच राहिले असण्याची शक्यता आहे.

