ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक, लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या संशोधन, लेखन आणि विज्ञानप्रसाराच्या कार्यातून विज्ञानाला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी स्थिर स्थिती विश्वसिद्धांतावर केलेले संशोधन आणि ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ हे त्यांच्या वैज्ञानिक योगदानाचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.महापौरपदावर असताना डॉ. नारळीकर यांची भेट घेतली होती. शरीर थकलेले असतानाही त्यांच्यातील उत्साह माझ्यासारख्यालाही लाजवणारा होता. संशोधक म्हणून असणारी त्यांची उंची उत्तुंग तर होतीच, पण त्यांच्यातील माणूसपणही भावणारे होते.सामान्यांमध्येही विज्ञानाची गोडी निर्माण करण्यात डॉ. नारळीकर यांच्या लेखणीचा मोठा वाटा होता. या लेखणीमुळे अनेकांना खगोल विश्वाकडे, विशेषतः संशोधनाकडे आकर्षित केलं.‘आयुका’च्या स्थापनेद्वारे त्यांनी भारतातील खगोलशास्त्र संशोधनाला नवी दिशा दिली. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने विज्ञानजगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे !
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

