Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे -अन् महावितरणची कसोटी

Date:

पुणे, दि. २० मे २०२५यंदा मान्सूनचे लवकरच आगमन होईल अशी सध्या स्थिती आहे. मात्र दररोज अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. त्यातच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे सुरळीत वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित होणे हे वीजग्राहकांना जेवढे नकोसे आहे तेवढेच महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांना देखील नकोसे आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंते व कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. परंतु कोणत्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम पर्यायी वीजयंत्रणेमधून वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

ज्या भागात उपरी (ओव्हरहेड) वीजवाहिन्या आहेत, तेथील वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर तसेच डबलपोल स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनी मातीचे असतात. विजेचा प्रवाह लोखंडी वीजखांबात उतरू नये यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हात चिनी मातीचे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीज प्रवाह खंडित होतो.

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारण म्हणजे वादळ वाऱ्यांमुळे वीजयंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे. वीज कोसळणे वा कडकडाटामुळे दाब वाढणे तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने फिडर पिलर, रिंग मेन युनिट अशा वीजयंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. पीएमसी, पीसीएमसी, एमएनजीएल, मेट्रो, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण व इतर संस्थांच्या विविध कामांसाठी जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात येते आहे. यात काही ठिकाणी भूमिगत वाहिन्या तोडल्या जातात व वीजपुरवठा खंडित होतो. तर काही भूमिगत वाहिन्याचे थोडेफार नुकसान होते. मात्र वीजपुरवठा खंडित होत नाही. परंतु पावसाला सुरवात झाली की साचलेले पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व बिघाड होतो. किंवा संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधणे, दुरूस्तीसाठी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट लावणे आदी कामे अविश्रांत करावी लागतात.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डबल पोल स्ट्रक्चर अशा वीजयंत्रणेजवळ घरगुती सुका व खाद्य पदार्थांचा ओला कचरा टाकण्यात येतो. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात. वीजयंत्रणेला या प्राण्यांचा स्पर्श झाला की शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या दोन महिन्यांमध्ये वीजयंत्रणेजवळ सुका कचरा, उस किंवा गवत पेटल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे तब्बल ८ प्रकार घडले आहेत. त्याचा सुमारे ७ लाख ६५ हजारांवर ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला आहे.

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध- वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सर्वप्रथम पर्यायी वीजपुरवठ्यासाठी उपकेंद्रांशी संपर्क करणे, बिघाड शोधण्यासाठी पेट्रोलिंग करणे, झाडे, फांद्या हटविण्यासाठी विविध यंत्रणेशी संबंध, दुरूस्ती कामांसाठी वीजसुरक्षेचे परमीट, अंतर्गत संपर्क, साहित्य व इतर पाठपुराव्याची विविध कामे आदींसाठी स्थानिक अभियंते किंवा जनमित्रांचे मोबाईल प्रामुख्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सातत्याने व्यस्त असतात.

त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी वीजग्राहकांकरिता महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. या टोल फ्री क्रमाकांवर ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते व लगेचच संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते. यासह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देण्याची किंवा मोबाइलवरून NOPOWER<ग्राहक क्रमांक> हा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविण्याची सोय उपलब्ध आहे.

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचा बिघाड शोधणारे, अविश्रांत दुरूस्तीचे काम करणाऱ्या अभियंते व जनमित्रांसाठी पावसाळी दिवस अतिशय आव्हानात्मक आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...