मुंबई : हा जल्लोष नाही, तिरंगा यात्रा काढून अख्खा देश सैनिकांसोबत आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीला आम्ही मानवंदना देत आहोत. भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन मानवंदना देण्याचा निर्णय घेतला तर त्यात गैर काही नाही. जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे. तिरंगा रॅलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा एक विधायक रॅली काढली जात आहे, असे उदय सामंत म्हणाले.
पाकिस्तानसोबतच्या युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, थोडा संयम बाळगावा, विजय रॅली ज्या निघत आहेत त्या टाळाव्यात, अशी विनंती अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे. आपण पाकविरोधात विजय मिळवला नाही. त्याच्याशी केवळ यु्द्धविराम झाला आहे. त्यामु्ळे देशभरात सुरू असणारा जल्लोष मनाला वेदना देणारा आहे, अशी खंत अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. यावरून आता सत्ताधाऱ्यांकडून अमित ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे.
तिरंगा यात्रा ही सैनिकांचे मनोबल वाढविणारी मानवंदना: उदय सामंत
Date:

