मुंबई :अमित ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेले पत्र प्रसिद्धीसाठीचे पत्र असून हा बालिशपणा आहे, असा टोला गिरीष महाजन यांनी लगावला. संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आपण काय केले म्हणून? तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? असा सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. संपूर्ण जगाने पाहिले, आमच्या सैन्याने काय केले आणि तुम्हाला आता काय त्याचा रिझल्ट पाहिजे, हा संपूर्ण बालिशपणा चालला आहे. प्रसिद्धीसाठी असे पत्र लोक का लिहितात? मला काही कळत नाही, असे पत्र लिहिण्याची काहीच आवश्यकता नाहीये, असे गिरीष महाजन म्हणाले.
हा अमित ठाकरेंचा बालिशपणा-गिरीष महाजन
Date:

