मुंबई-मुंबई येथील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम येथे नामकरण सोहळा पार पडला. यावेळी क्रिकेटपटू रोहित शर्मा तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. अजित वाडेकर यांच्याही नावाचे स्टँड यावेळी उभारण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर दिसून आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले, अतिशय ज्येष्ठ नेते ज्यांचे क्रिकेटमधील योगदान नेहमीच लक्षात राहील असे शरद पवार साहेब तसेच आपल्या बॅटिंगने मंत्रमुग्ध करणारे रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी भगिनी आणि बंधूंनो मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. मी एमसीएने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो.
शरद पवार यांच्याबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही की भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणि क्रिकेटचे जे प्रशिक्षक असतील त्यांच्यात शरद पवार यांचे नाव नेहमीच आदरणीय राहील. बीसीसीआय असेल किंवा आयसीसी असेल यात शरद पवार यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे एमसीएने शरद पवार यांच्या नावाचे स्टँड उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे याचे मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माझे मित्र अमोल काळे यांनी एमसीएमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. अमोल काळे यांना ईश्वराने अचानक नेले पण त्यांनी पाहिलेले स्वप्न एमसीए नक्कीच पूर्ण करेल. एमसीए लौंजला त्यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच रोहित शर्मा म्हणजे जे मैदानात आल्यावर मैदान दणाणून सोडतात. त्यांनी अशा दोन स्पर्धा जिंकवून दिल्या आहेत, ज्या आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण करून दाखवल्या. त्यांचे मैदानात मोकळेपणे वागणे अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी अतिशय लीलया या ठिकाणी कर्णधार म्हणून सगळ्या फॉरमॅटमध्ये अतिशय सुंदर आहे. आम्ही आता वाट पाहत आहोत की त्यांचा एक शॉट कधी रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो याची आम्हा सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगले आणि अधिक काळ खेळतील.
खरे तर लोक पूर्वी असे म्हणायचे की लॉर्ड ही क्रिकेटची पंढरी आहे. परंतु खरी पंढरी ही वानखेडे आहे. पंढरी तिथे देव त्या अर्थाने वानखेडे येथे सचिन तेंडुलकरचा पुतळा आहे. वानखेडे पेक्षा मोठे स्टेडियम उभारण्याची जागा आम्ही उपलब्ध करून देऊ जिथे एक लाख प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. चार वर्षांनी एमसीएला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी अजून एक नवीन स्टेडियम उभारले जाईल, असा आपण प्रयत्न करू. या अतिशय सुंदर कार्यक्रमात तुम्ही मला बोलावले हा मी माझा सन्मान समजतो.

