शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील?-खासदार संजय राऊत

Date:

अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत

आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धोका निर्माण केला-काँग्रेसने खुलासा न मागता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागायला हवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसलाही सुनावले आहे. एक प्रधानमंत्री देशाशी खोटे बोलत आहे आणि आपल्या सैनिकांचे पाय खेचून त्यांना मागे घ्यायचे काम करत आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी धोका निर्माण केला आहे. ते आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोट्या खेळत आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

मुंबई- अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये घ्यायला तयार नाहीत. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर खोचक टोला लगावला आहे. या संबंधी ते म्हणाले की, शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मोदी – शहा गेल्यानंतर यांच्याकडे काहीही राहत नाही. त्यामुळे हे दिवस निघून जातील, असा सल्ला देखील त्यांनी शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांना दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच देशाच्या राजकारणातून बाजूला होतील, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. त्यांना देशातील राजकारणातून जावे लागेल. फक्त माझे पुस्तक येण्याची वाट पहा. त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. माझे पुस्तक आल्यानंतर अमित शहा यांच्या अध:त्पतनाला सुरुवात होणार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपच्या वतीने काढण्यात येणाऱ्या तिरंगा यात्रेवरही त्यांनी निशाणा साधला. तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. जागतिक युद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच शस्त्रसंधी झाल्यानंतर अशा प्रकारे आनंद साजरा होत असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्ध विराम आणि माघार घेत, शस्त्रसंधी करून हाच विजय मानून एक पक्ष विजयी सोहळा साजरा करत आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. शस्त्र संधी हा विजय कसा असू शकतो? दुसऱ्यांच्या हस्तक्षेपाने झालेली शस्त्र संधी हा विजय कसा असू शकतो? असे प्रश्न राऊत यांनी विचारले आहेत.

या वेळी राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी देखील तिरंगा यात्रा काढली होती. यावरुन त्यांचे डोके फिरले आहे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. तुमच्या माघारी मुळे युद्ध विरामामुळे अख्खा देशाला धक्का बसला आहे. तुमच्या अशा धोरणामुळे अख्खा देश धक्क्यात असताना एकनाथ शिंदे यांनी तिरंगा यात्रा नाही तर डोनाल्ड यात्रा काढायला हवी, असा टोलाही त्यांनी लगावला. शिंदेंनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यायला हवा, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...