कॉंग्रेसने स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून पुढे शून्यातून देश घडविण्यात दिलेल्या योगदानाबाबत चुकीच्या अफवा पसरविणे भाजपचे काम-कॉंग्रेस
पुणे-काश्मीर मध्ये कधीही झाला नव्हता अशा पद्धतीचा धर्म विचारून पर्यटकांवर पहिलाच हल्ला सुरक्षेच्या चुकीच्या कारणास्तव पहलगाम मध्ये झाला, यावर राजकारण न करता, विरोधी पक्षांनी या वरून केंद्र सरकार आणि भारतीय लष्कर जी काही कारवाई करेल तिला पाठींबा देऊन मोठेपणा दाखविला असे मत मांडून केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समाज माध्यमावर एका POST द्वारे युद्धाचे राजकारण सुरु केल्याचे ठपका ठेऊन त्यांच्या या कृत्यावर त्यांना ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. मुरलीधर मोहोळांनी युद्धाचं केलं राजकारण सुरु अशा आशयाचे रोहित पवारांचे प्रत्युत्तर तर अरविंद शंदे यांचे थेट मैदानात येऊन जाहीर वादविवाद चर्चेचे आवाहन त्यावर आले आहे .कॉंग्रेसने स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून पुढे शून्यातून देश घडविण्यात दिलेल्या योगदानाबाबत चुकीच्या अफवा पसरविणे हेच भाजपचे काम असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम (pahalgam terror attack) येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. एप्रिलमध्ये या हल्ल्यात 26 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरला सुरुवात केलीये. भारताने पाकिस्तानातील लष्करी तळांना लक्ष केलं आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ग्राफिक शेअर करताना त्यावर ‘जेव्हा देशात मजबूत सरकार असते…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळात ज्या-ज्या वेळी दहशतवादी हल्ले झाले. त्यावेळी भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र काँग्रेसचे सरकार असताना असे झाले नाही…’ असे कॅप्शन दिले आहे. यावरून मुरलीधर मोहोळ यांनी थेट तत्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधून राजकारण सुरु केलं आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मा. मोहोळ साहेब, आज संपूर्ण देश, सत्ताधारी–विरोधी असे सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत, सैन्यासोबत उभे आहेत, कारण हा विषय राजकीय नाही तर देशाच्या स्वाभिमानाचा आणि सुरक्षेचा आहे. आपण एक जबाबदार मंत्री आहात, त्यामुळं किमान सध्याला तरी अशा पोस्ट करणे संयुक्तिक वाटत नाही. राजकीय चर्चा नंतरही करता येतील कारण ही ती वेळ नाही. ही वेळ आहे देशाच्या शत्रूला धडा शिकवण्याची… त्यामुळे राजकारण बाजूला ठेवूया आणि हातात हात घेऊन भारतीय म्हणून सीमेवर लढणाऱ्या सैन्यासोबत आणि सरकारसोबत भक्कमपणे उभे राहूया, असे रोहित पवार म्हणालेत.
…मंत्री महोदयांनी ठिकाण आणि वेळ ठरवावी, आम्ही लेखाजोखा मांडायला येवू : अरविंद शिंदे
यावर आता पुणे शहर कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, मोहोळ यांना थेट जाहीर वाद विवाद चर्चेचे आव्हान त्यांनी देताना म्हटले आहे कि,’ पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर काल दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने आजवरच्या काँग्रेस सरकारांवर जाहीर टीका केली. आजवरच्या काँग्रेस सरकारच्या काळात देशाचे सार्वभौमत्व, संरक्षण सज्जता आणि देशांतर्गत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल असत्य पसरवण्याचा प्रयत्न केला.
सध्या आपला देश दहशतवादी पोसणाऱ्या पाकिस्तानशी लढतोय. आपली तिनही सैन्यदलं प्राणाची बाजी लावून लढत आहेत. केंद्र सरकार, काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष, संपूर्ण भारतीय समाज एकत्र येऊन शत्रू राष्ट्र पाकिस्तान आणि जगाला आपली एकजूट दाखवणं ही प्राथमिकता, असा संदेश आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे , आमचे नेते राहुल गांधी यांनी आम्हांला दिला आहे. म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांवर सध्या कांहीही टीका टिपन्नी करणारं नाही. देशहीताला, एकजुटीला आमचं प्राधान्य. देश संकटात असताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवणं आमच्या पक्षाची संस्कृती.
तरीही, मंत्री महोदय त्यांनी पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या विचारांवर आणि पक्षीय राजकारणावर ठामच असतील तर आमची तयारी आहे. त्यांनी ठिकाण, वेळ सांगावी. आम्ही तिथं येऊन काँग्रेसने देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी आजवर काय केलं हें सविस्तर सांगू. काँग्रेसने देशांतर्गत दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारत विरोधी शक्तींचा कसा बंदोबस्त केला ते सांगू. पाकिस्तानचे तुकडे कसे केलें ते सांगू. सेना दलांना आधुनिक शस्त्रास्त सज्जता कशी केली ते सांगू. दहशतवाद्याना काँग्रेस काळात कसं शोधू शोधू पकडलं, फासावर लटकवलं, गोळ्या घालून ठार केलं ते सांगू. अन्वस्त्र सज्जता, आधुनिक पानबुडी, फायटर विमान, रणगाडे, सैन्य भरती याविषयीं माहिती देवू. संरक्षण दलासाठी काम करणाऱ्या दारुगोळा बनवणारें कारखाने, DRDO, NDA सारख्या शेकडो संस्था कशा, कोणी, कधी, कुठे उभ्या केल्या तेही सांगू.
शिवाय हल्ला झाल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची काँग्रेस काळातील उदाहरणं ही सांगू.
संसद हल्ला, दहशतवादी पैसे देवून सोडणं, उरी, पठाणकोट, मालेगाव बॉम्बस्फ़ोट, अमरनाथ यात्रेकरू हल्ला, पुलवामा हल्ला, पहलगाम हल्ला यावर ही बोलू. सैन्याची पेन्शन, अग्निवीर योजना यावर ही बोलू. आपल्या निरोपाची आम्ही वाट पाहू

