एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा.
मुंबई-भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियानं घ्यावा. सुप्रिया सुळेंचं काय या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पक्षात दोन प्रवाह, एकाला वाटते अजितसोबत जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.उपमुख्यमंत्री अजित पवार (AjitPawar) यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवारांच्या (SharadPawar) भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NationalistCongressParty) कोणाचा यावरुन दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती. मात्र, आता शरद पवारांच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या आहेत.
शरद पवार म्हणाले, भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय…आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकञ आहेत…आमचे दिल्लीतले खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत…होय, राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकासकामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे…पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही त्यांचा तो एकञ बसून घ्यावा.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही. याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. कारण दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी नेते हे एकाच विचाराचे आहेत. मी आता या प्रक्रियेमध्ये नाही. भविष्यात एकञ यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला झालोय…
शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवलाय. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा मी व्यक्त करतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे, पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढलेत, त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे, असं वाटत नाही.
शरद पवार यांनी The Indian Express ला दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाचे राजकीय मुद्दे स्पष्ट केले आहेत. या मुलाखतीतून शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर ठाम भूमिका घेत, पक्षातील मतभेद, राष्ट्रीय राजकारणातले तणाव, आणि स्वतःची राजकीय सक्रियता यावर स्पष्ट संकेत दिले. या मुलाखतीतील काही ठळक मुद्द्यांचा सारांश पहा….
अजित पवार गटासोबत जाण्याविषयी स्पष्ट वक्तव्य : त्यांनी कबूल केले की, “आमच्यातील एका गटाला अजित पवार यांच्यासोबत जावेसे वाटते. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, “चुकीच्या रस्त्यावर गेलेल्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू, पण जर ते तयार नसतील, तर त्यांना बाजूला काढू.
सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास : संसदेमध्ये सत्ताधारी की विरोधी बाकांवर बसायचे, याचा निर्णय सुप्रिया सुळे घेईल, असे त्यांनी सांगितले. ती संसदेमध्ये आहे, निर्णय तिने घ्यायचा आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांचा कमकुवत पर्याय : शरद पवार म्हणाले की, “जनतेला मोदींना पर्याय हवा आहे, पण विरोधक तो देऊ शकलेले नाहीत. त्यांनी हे विरोधकांच्या कमकुवत नेतृत्वावर आणि समन्वयाच्या अभावावर वक्तव्य केले आहे.
कृषी कायदे आणि केंद्र सरकारवर टीका : केंद्र सरकारने “राज्यांशी चर्चा न करता तीन कृषी कायदे जबरदस्तीने लादले,” अशी टीका शरद पवार यांनी केली. कृषी हे क्षेत्र दिल्लीमध्ये बसून चालवता येत नाही,” असा दावा देखील त्यांनी केला आहे.
राजकीय निवृत्ती नाकारली : मी ना थकलोय, ना निवृत्त झालोय,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकांशी संवाद सुरू ठेवण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला.
RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर टिप्पणी : भागवत यांच्या “देवता-पुरुष” संदर्भातील विधानांवर “बुद्धिमान लोकांनी याची दखल घ्यावी,” अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे.

