युद्ध भावनांनी जिंकता येत नाही, ते शस्त्रास्त्राच्या युक्तियुक्त शास्त्राने जिंकले जाते – पृथ्वीराज चव्हाण
मुंबई-भारत सरकारच्या वतीने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नष्ट करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भारतीय सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. त्यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रिये नंतर आता त्यावर अनेकांनी प्रत्युत्तर दिले आहे.काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सरकारने ‘भावनिक फायदे’ मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव निवडले होते, परंतु याचा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. त्यांच्या मतपेढीला खूश करण्यासाठी, ते पहलगाम विधवांच्या भावनांवर चिखलफेक करत आहेत. दररोज ते एका नवीन पातळीला जात असल्याची टीका देखील चव्हाण यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर यावर देशभरातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पहलगाममध्ये निष्पाप लोकांची कत्तल झाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल मी भारत सरकार आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन करू इच्छितो. 15 दिवस झाले असल्याने, काय घडत आहे याबद्दल लोक चिंतेत होते.. “हो, ‘सिंदूर’ या शब्दाशी अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत, परंतु युद्ध भावनांनी जिंकता येत नाही. ते शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याने जिंकले जाते. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव सरकारने ‘भावनिक फायदे’ मिळवण्यासाठी निवडले होते, परंतु याचा जमिनीवर काहीही फायदा होणार नाही.”

