ॲापरेशन सिंदूर’वर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया…
‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारतीय सैन्याची अत्यंत धाडसी, यशस्वी आणि ऐतिहासिक कारवाई आहे! दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर देताना सैन्याने देशाचा अभिमान आणखी वाढवला. या स्ट्राईकला ‘सिंदूर’ हे नाव देऊन आपल्या संस्कृतीचा सन्मान तर केला गेलाच, शिवाय पीडितांना न्यायही मिळवून दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना प्रत्युत्तर देण्यासाठी दिलेली मोकळीक सैन्यदलाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्त्वाचा धागा ठरली. नवा भारत असे भ्याड हल्ले सहन करणार नाही आणि चोख उत्तर दिल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही, हे मोदी सरकारने अधोरेखित केले आहे.
स्वागतार्ह बाब म्हणजे केवळ पहलगामच नाही, तर आधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचाही बदला घेतला गेला असून ही कारवाई नव्या भारताच्या सामरिक ताकदीची आणि आत्मविश्वासाची साक्ष देणारी आहे.

