मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महयुती एकत्रित लढेल. एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो. पण धोरण म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले आहेत.या निर्णयाचे आपण मनापासून स्वागत करतो आणि निवडणूक आयोगाने तयारीला लागावे असे आमचे म्हणणे आम्ही त्यांच्यापर्यंत कळवू असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढेल:एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय होऊ शकतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Date:

