बॉलीवूड चा हि एक काळ होता, चेहरे आणि नावे पाहून सिनेमांना गर्दी व्हायची.. सिनेमा तिकीट खिडकी पुढे जी रांग असायची त्या रांगेतील लोकांच्या खांद्यावर पाय देत पुढे जाऊन तिकीट खिडकीतून तिकिटे घेणारी बहाद्दर रसिक तेव्हा होते , सिनेमा पाहण्यासाठी त्याच्या तिकिटासाठी एवढी मेहनत लोक घेत धक्काबुकीत रांगेत उभेत राहून घुसून एकमेकांच्या अंगावर चढून तिकिटे काढत यामुळे थिएटर चालकांना तिकीट विक्री सुरु करताना पोलीस बंदोबस्त बोलवावा लागत … आज काळ पेड पब्लिसिटी,प्रमोशन करून नट नट्या प्रत्यक्षात बोलावूनही गर्दी काय कोणी धुनही पाहत नाही त्याला कारणही तसेच आहे तेव्हा आपल्या चित्रपटाची निर्मिती साठी घरदार सोडून दिवस रात्र मेहनत घेणारे निर्माते,अभिनेते , दिग्दर्शक आणि संगीतकार होते. असंख्य चित्रपट संगीत या एका गुणावर अजरामर झाले. ज्याच आज स्मृती दिन आहे तो बॉलीवूड मधला धर्मात्मा फिरोज खान अशाच अविस्मरणीय बॉलीवूड च्या कारकिर्दीतला एक मोहरा ठरला .फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.त्यांचा जन्म. २५ सप्टेंबर १९३९चा.
भारतीय फिल्म इंडस्ट्रीत असे फार कमी लोक आहेत, ज्यांना अनेक कामात कौशल्य प्राप्त आहे. अशाच काही मोजक्या लोकांपैकी एक नाव होते फिरोज खान. फिरोज खान यांनी भारतीय सिनेसृष्टीत अभिनेता, एडिटर, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. फिरोज खान हे अफगाण वंशाचे होते. त्यांचे वडील अफगाणिस्तानच्या गजनी भागातील तर आई ईराणी होती. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिरोझ खान यांना पसंती देण्यात येऊ लागली.‘आदमी और इन्सान’मधील भूमिकेसाठी त्यांना पहिला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ते दिग्दर्शक-निर्मातेसुध्दा होते. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘धर्मात्मा’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूप लोकप्रियता लाभली. सत्तर-ऐंशीच्या दशकात फिरोझ खान यांचा चाहतावर्ग तयार झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कुर्बानी’ ‘जाँबाज’ आणि ‘दयावान’ हे चित्रपटही हीट ठरले. १९९२ साली दिग्दर्शित केलेल्या ‘यल्गार’नंतर फिरोझ खान चित्रपटसृष्टीपासून दूर गेले होते. पुत्र फरदीन खानला ‘लॉँच’ करण्यासाठी १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश लाभले नाही. ‘वेलकम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘आरडीएक्स’ नावाच्या आंतरराष्ट्रीय डॉनची भूमिका लोकप्रिय झाली होती. ‘वेलकम’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.
त्याकाळात फिरोज खान आणि मुमताज यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. रील लाइफपेक्षा वेगळे रिअल लाइफमध्येसुध्दा दोघे जवळचे मित्र होते, मैत्रीसोबतचे दोघे व्याहीसुध्दा होते. २००५ मध्ये फिरोज यांचा मुलगा फरदीनने मुमताज यांची मुलगी नताशासोबत लग्न केले.
बॉलीवूड मधला धर्मात्मा फिरोज खान यांचा आज १८वा स्मृतिदिन
Date:

