श्रीनगर – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ममता बॅनर्जी यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सरकार पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करेल.
मुख्यमंत्री ममता म्हणाल्या की, त्यांनी शहीद बिटन अधिकारी यांच्या पालकांशी फोनवरून संवाद साधला. आरोग्य सुविधेअंतर्गत त्यांच्यासाठी स्वास्थ्य साथी कार्ड बनवण्यात आले आहे आणि त्यांना दरमहा १०,००० रुपये पेन्शन दिले जाईल. बिटनच्या पालकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल आणि त्याच्या पत्नीलाही ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
याशिवाय, बेहला आणि पुरुलिया येथील इतर दोन पीडितांच्या कुटुंबियांनाही प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई दिली जाईल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नोकरी करायची असेल, तर सरकार नोकरी देखील देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उधमपूरमध्ये शहीद झालेल्या निमलष्करी दलाच्या जवानाच्या पत्नीशीही त्या बोलल्या. सरकारने त्यांना १० लाख रुपये भरपाई आणि सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेतला आहे. मी लवकरच मुर्शिदाबादला जाऊन तीन बाधित कुटुंबांना भेटेन आणि त्यांना भरपाई देईन. या दुःखाच्या वेळी राज्य सरकार पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

