महाराष्ट्रातील ढोल ताशा पथकांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचे पुण्यात 

Date:

उत्तम संघटन, आर्थिक शिस्त आणि त्याचे नियोजन यावर मार्गदर्शन ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पुणे : महाराष्ट्रातील सर्व ढोल ताशा पथकांचे एकत्रीकरण करण्यासोबतच तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार काही प्रश्न आहेत ते सोडवता येतील का, याचा विचार करण्याकरिता आणि पथकांवरील टीकेवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील ढोल ताशा पथकांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र च्या वतीने पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ४ मे २०२५  रोजी सकाळी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बीएमसीसी कॉलेज आॅफ कॉमर्स येथील टाटा हॉल मध्ये हे अधिवेशन होणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला अनुप साठ्ये, विलास शिगवण, अ‍ॅड. शिरीष थिटे, ओंकार कलढोणकर, अमर भालेराव, अक्षय बलकवडे, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.

अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते होणार आहे. तसेच समारोप केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांचे उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात पुणे शहरातील अनेक गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. ढोल ताशा वादनाचा प्रचार-प्रसार उत्तमपणे कसा होईल, यावर विचार विनिमय यावेळी करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव, शिवजयंती, गुढी पाडवा या सण उत्सवांमध्ये पथके शिस्तबद्ध आणि जल्लोषपूर्ण वादन करीत असतात. या शिस्तबद्ध वादनातून सर्व सण उत्सव पवित्रपणे आणि शिस्तीत साजरा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, त्यामुळे बहुतांशी युवक युवती यामध्ये सहभागी होतात. या अधिवेशनावाच्या निमित्ताने या युवक युवतींना संस्कारक्षम काही देऊ शकतो का, याचे विचार मंथन देखील यावेळी होणार आहे. पथकांवरील होणारी टीका यावरही काय उपाययोजना करता येतील याबाबतही चर्चा होणार आहे. यापूर्वी दोन वेळा ढोल ताशा वादनास राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत, ही मागणी देखील केंद्र सरकार कडे पूर्ण ताकदीने मांडण्यात येणार आहे.

दिमडी, संबळ, नगारा, ताशा, जेंबे या  वाद्यांचा तालचक्र हा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच ढोल ताशा पथकातील वादकांचे छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धा देखील या वेळी आयोजित केले आहे. अशी विविध सत्रांची मांडणी या अधिवेशनात केली आहे. पथकांवरील टीकेवर चर्चा करण्यासाठी आप की अदालत या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागपूर, नाशिक, मुंबई , ठाणे , पिंपरी चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यांसह अनेक ठिकाणच्या पथकातील दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बरोबरच गोवा, बंगळुरू , इंदूर येथील पथके देखील सहभागी होतील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.