पुणे-पर्यटकांच्या रक्षणासाठी आतंकवाद्यांना विरोध करता करता मरण पावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह ला सरकारने मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी केली आहे. त्यांनी या सय्यद हुसेन शह च्या कामाबाबत जागरण , ANI आणि विविध हिंदी दैनिकांनी घेतलेली दखल सरकारने लक्षात घ्यावी असेही म्हटले आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेला एका मुस्लिम तरुणाची स्टोरी माध्यमे आणि सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. तो तेथील स्थानिक घोडेस्वार सय्यद आदिल हुसेन शाह या नावाचा युवक आहे. (Syed adil Hussain Shah) ज्याला पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सय्यद आदिल हुसेन शाहला जीव गमवावा लागला आहे. तो दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती समोर आली आहे.
त्याने निर्दोष पर्यटकांना मारु नये अशी विनंती दहशतवाद्यांना केली तसेच पर्यटक हे काश्मिरी लोकांचे पाहुणे आहे, त्यांची सेवा करणे आमचे काम आहे आणि कामाचे दुसरे नाव जिंदगी आहे , त्यांना मारु नका असं देखील तो म्हणत होता.सय्यद आदिल हुसेन शाह घोडेस्वार होता आणि तो त्याच्या कुटुंबात एकमेव कमावणारा होता. सय्यद आदिल हुसेन शाह याच्या मृत्यूनंतर माध्यमांशी बोलताना त्याची आई भडभडून रडत होती . सय्यद आदिल हुसेन शाहच्या आईने सांगितले की, आदिल कुटुंबातील एकमेव कमावणारा पुरुष होता. तो आमचा एकमेव आधार होता. तो घोडेस्वारी करून कुटुंबाचा खर्च चालवत होता. आता आम्हाला दुसरा कोणी नाही. असं रडक्या आवाजात आदिलच्या आईने माध्यमांना सांगितले.दैनिक जागरणने काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, सय्यद आदिल हुसेन शाह पर्यटकांना फिरायला घेऊन घोड्यावरून बैसरनला गेला होता मात्र जेव्हा हल्ला सुरु झाला तेव्हा त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. हे काश्मीरचे पाहुणे आहेत. निर्दोष आहे. त्यांना मारू नका.अशी विनंती आदिल दहशतवाद्यांना करत होता. त्यानंतर त्यांने दहशतवाद्यांची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावरच गोळीबार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला.

