संगीता गणबोटे यांनी सांगितला थरारक अनुभव….गणबोटे- जगदाळे यांच्यात गेल्या 25 वर्षांपासून मैत्री
पुणे- पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले संतोष जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात दाखल झाले आहे. संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृद्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटून निघाले होते. मी काश्मीरला फिरायला जातोय, लवकर परत येईल, असे त्यांनी आईला सांगितले होते. मात्र जगदाळे यांचा मृतदेह घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. त्यांच्या पत्नी धाय मोकलून रडत होत्या.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कर्वे नगर येथे जगदाळे कुटुंबाला भेटण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. शरद पवार यांच्यासमोर जगदाळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी ही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले. पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या त्यावेळी मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
काश्मीर मधील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देखील सहा पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा मृतदेह सकाळी पुण्यात दाखल झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी नेण्यात आला. या वेळी घरातील सर्व नातेवाईकांना शोक अनावर झाला होता. जगदाळे यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पुण्यातील संताेष जगदाळे आणि काैस्तुभ गनबाेटे या दाेघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या डाेळ्यासमाेर अतिरेक्यांनी गाेळ्या घालून ठार केले. या दाेघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री हाेती आणि फरसाणच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली हाेती. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मैत्रीचा करुण शेवटही एकत्रच झाला. जगदाळेंचे एकुलत्या एक एमबीए झालेल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नाचे, तर गनबाेटे यांचे नातवाचे बारसे करण्याचे स्वप्न अधुरे राहिले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्याचे उद्योजक कौस्तुभ गणबोटे दुर्दैवी मृत्युमुखी पडले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाचे राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. गणबोटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत गणबोटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शरद पवार यांच्या समोर कौस्तुभ यांची पत्नी यांनी घडलेला सर्व थरारक अनुभव सांगितला.“तिथं एकही सुरक्षा रक्षक नव्हता. रक्तात पडलेली आमची माणसं होती. आम्ही कोणाला आवाज देणार तिथं? आम्ही खूपच घाबरलो होतो. ते बंदूक घेऊन आले आणि त्यांनी गोळ्या मारायला सुरुवात केली. त्यांनी काहीच बघितलं नाही. डोक्यात, डोळ्यात, छातीत गोळ्या मारल्या. ते सहा ते सात लोक होते आणि अर्धा तासाच्या आत त्यांनी येऊन गोळ्या झाडल्या व निघून गेले,” काळजाचा थरकाप उडवणारा असा हा प्रसंग संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं शरद पवारांना सांगितला.
मुलगा पित्याचा मृतदेह आणण्यास गेला; घरात फक्त सून, नातू होते
गनबोटेंची पुण्यात फरसाणची १६ दुकाने आहेत. काेंढवा परिसरातील सुखसागरमधील साईनगर येथे दाेनमजली गनबाेटे फरसाणचा बाेर्ड येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. घराशेजारीच फरसाण बनवण्याचे युनिट आहे. ताजे फरसाण मिळण्याचे ठिकाण म्हणून इथे गर्दी असते. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गनबाेटे फरसाणची तब्बल १६ दुकाने असल्याने व्यवसाय एकदम व्यवस्थितरीत्या सुरू हाेता. मात्र, बुधवारी या ठिकाणी फरसाण कारखान्यातील कामगार घरातील मदतीसाठी झटत हाेते, तर काैस्तुभ गनबाेटेंचा मुलगा कुणाल सकाळच्या विमानाने श्रीनगरला रवाना झाल्याने घरी केवळ सून व नातू हाेते. लाडक्या नातवाचे बारसे मित्राला धूमधडाक्यात करण्याची इच्छा हाेती. परंतु त्यापूर्वीच देवाने त्याला हिरावून नेल्याचे सांगत गनबाेटेंचे मित्र प्रवीण कुलकर्णी म्हणाले, तो मलाही सहलीला साेबत चल म्हणाला हाेता, परंतु मी यापूर्वी काश्मीरला जाऊन आलाे असल्याने त्यास नकार दिला हाेता. आज मी बचावलाे आहे. मात्र, माझ्या मित्राच्या कुटुंबावर आज दु:खाचा डाेंगर काेसळल्याचे ते म्हणाले.

