Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंसमोर कोणत्याही अटी-शर्ती नाहीत:दोघे भाऊ एकत्र येत असल्याच्या वृत्ताने शिंदे-फडणवीसांच्या पोटात गोळा – संजय राऊत

Date:

संदीप देशपांडे यांना दिले प्रत्युत्तर, चांगल्या कामात अडथळे आणण्यासाठी पक्षाबाहेरून यांना कोणी ऑपरेट करतेय ?

मुंबई-राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हिताचा विषय मांडला. त्याला उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद देखील महाराष्ट्राच्या हिताचा होता. मात्र, ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे काही लोकांना वाटत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र हितासाठी दोन भाऊ एकत्र येण्यावर सहमती होत आहे. तर त्यामध्ये वाद करण्यासारखे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या समोर कोणत्याही अटी-शर्ती ठेवलेल्या नसल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हिताच्या फॉर्मुलामध्ये भारतीय जनता पक्ष बसत नाही. त्यांच्यासोबत असलेले लोक या फॉर्मुलात बसत नाही. त्याला तर कोणी अटी आणि शर्ती म्हणत असतील, तर त्यांनी थोडा विचार करावा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी काम करायला तयार आहोत. माझ्यासारखा माणूस देखील त्यासाठी सकारात्मक आहे.

मी अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. मी श्रीकांत ठाकरे सोबत देखील एकत्र काम केले आहे. आता मी आदित्य सोबत देखील काम करत आहे. मात्र महाराष्ट्र हित कशात आहे? मराठी माणसांचा स्वाभिमान कशात आहे? हे आम्हाला माहिती आहे. बाळासाहेबांचे ध्येय महाराष्ट्र आणि मराठी माणूस होता. त्यासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर चांगले आहे. तर आम्ही त्यांचे स्वागतच केले आहे. केवळ महाराष्ट्र द्रोही असलेल्या लोकांना पंगतीला देखील बसू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले असल्याचे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांनी जे विधान केले आहे, त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रति विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते काय बोलतात, त्यावर मी उत्तर देणार नाही. राज ठाकरे बोलल्यानंतर त्यावर बालू. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य देत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे

महाराष्ट्र द्रोही कोण? हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि ते जर तुम्हाला समजत नसेल, तर राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल. अशा शब्दात संजय राऊत यांनी संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे अत्यंत हुशार नेते आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना देखील महाराष्ट्र द्रोही कोण? हे माहिती आहे. मात्र, काही लोक चांगल्या कामात अडथळे निर्माण करत असतील, तर पक्षाच्या बाहेर राहुन कोणीतरी हे सर्व ऑपरेट करत आहे, हे मी ठामपणे सांगू सांगतो. या माध्यमातून संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मद्यतस्करी :18 लाखाचा मुद्देमाल जप्त,3 गजाआड

पुणे :दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ...

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार ‘दिव्यांग भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर, दि. 9 डिसेंबर 2025: महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि...

२०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; ‘भाऊबीजे’ला अतिरिक्त सुट्टी

मुंबई, दि. ९: महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व...

लोकमान्यनगरच्या पुनर्विकासासाठी — ११ डिसेंबरला ‘घंटानाद आंदोलन’

 नागपुरातील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यनगरचा आवाज बुलंद करण्याची तयारी —...