मुंबई- ज्यांना काही उद्योग नाही ते वाद घालतात, देशातील अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालते काही जण म्हणतात ही राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे, मला त्या वादात पडायचे नाही, ज्यांना काही उद्योग नाही ते असे वाद घालतात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.आणि महाराष्ट्रात राहायचे असेल तर त्याला मराठी आलेच पाहिजे.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, इंग्रजी ही जगात बहुतेक देशांमध्ये चालते. त्यामुळे ही देखील भाषा आली पाहिजे. पण आपली मातृभाषा असलेल्या मराठीला पहिले स्थान आहे. आज समोरच्या राजकीय पक्षांना काही राजकीय मुद्दा राहिलेला नाही. उन्हाची तीव्रता, उष्माघात असे अनेक मुद्दे आहेत. जागतिक पातळीवर 103 टक्के पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली आहे. आता हा पाऊस पडला पाहिजे ही पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे.
अजित पवार म्हणाले की, नाशिक दगडफेक प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आम्ही काही पक्ष म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाही. जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार ते कोणत्या पक्षाचे आहे हे पोलिस पाहणार नाही. कुणीही जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्याचे काही खैर नाही.
अजित पवार म्हणाले की, बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक चौकशी सुरू आहेत. या सगळ्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर मंत्रिपदाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. निलंबित अधिकाऱ्याच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचे हे कुठेतरी विचार जनतेसह मिडीयाने केला पाहिजे. महिला वकीलाला जी मारहाण करण्यात आली त्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश मी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी कोण जबाबदार आहे, त्याला पाठिशी घालणार नाही.

