महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत, ती दृष्ये हटवण्यास आणि काही दृष्यांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. सीबीएफसीच्या या निर्णयावर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी संताप व्यक्त केला आहे. अनुरागने सोशल मीडियावर एक लांब पोस्ट लिहून सीबीएफसीवर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक मोठी गोष्ट देखील लिहिली.
Error: No feed found.
Please go to the Instagram Feed settings page to create a feed.
Error: No feed found.
Please go to the Instagram Feed settings page to create a feed.
Error: No feed found.
Please go to the Instagram Feed settings page to create a feed.
Error: No feed found.
Please go to the Instagram Feed settings page to create a feed.
Error: No feed found.
Please go to the Instagram Feed settings page to create a feed.
https://www.instagram.com/p/DIhdnKRNtQU/?utm_source=ig_web_copy_link

Error: No feed found.
Please go to the Instagram Feed settings page to create a feed.
अनुराग कश्यपने पोस्टमध्ये काय म्हटलं?
“धडक २च्या स्क्रिनिंग वेळी सेन्सॉर बोर्डने असं सांगितलं की मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केली आहे. याच आधारावर संतोष सिनेमादेखील भारतात प्रदर्शित झाला नाही. आता ‘फुले’ सिनेमावरुन ब्राह्मण समाजाला आक्षेप आहे. पण, भाऊ जर जाती व्यवस्थाच नाही राहिली तर ब्राह्मण कुठून आले? कोण आहात तुम्ही? तुम्हाला का त्रास होत आहे? जर जाती व्यवस्थाच नसती तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नसते. एक तर ब्राह्मण नाहीच आहेत, कारण मोदींच्यानुसार भारतात जाती व्यवस्थाच नाहीये. की सगळे मिळून सगळ्यांना मुर्ख बनवत आहेत? भारतात जाती व्यवस्था आहे की नाही, हे तुम्ही मिळून आधी काय ते ठरवा. लोक मुर्ख नाहीत. तुम्ही ब्राह्मण आहात की तुमचे पूर्वज होते जे आता इथे नाहीत…काय ते ठरवा”.अनुराग कश्यपने याआधी ‘फुले’ सिनेमावरुन चाललेल्या वादामुळे संतप्त पोस्ट शेअर केली
दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने ‘फुले’ चित्रपटाच्या निर्मात्यांना एकूण 12 बदल सुचवले आहेत. त्यात अनेक संवाद वगळण्याची, काही संवाद लहान करण्याची आणि ऐतिहासिक संदर्भ आणि उपशीर्षकांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे.
सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले 12 बदल खालीलप्रमाणे
चित्रपटाच्या सुरुवातीला दिलेल्या डिस्क्लेमरचा स्क्रीन टाइम वाढवावा. जेणेकरून ते जास्त काळ स्क्रीनवर राहील आणि वाचता येईल.
चित्रपटातील एक दृश्य, जिथे एक माणूस झाडू मारत आहे आणि काही मुले सावित्रीबाईंवर शेण फेकत आहेत, ही दृश्ये बदलावी लागतील.
चित्रपटातील संवाद, “शूद्राने झाडू बांधून चालले पाहिजे…” ते “आपण अशाच प्रकारे सर्वांपासून अंतर राखले पाहिजे का…?” बदलण्यास आणि सुधारित करण्यास सांगितले आहे.
एका संवादांत, ”3000 वर्षे जुनी… गुलामगिरी…” ऐवजी ”ती अनेक वर्षे जुनी आहे…” असा शब्द वापरायला हवा.
“पेशवाई असती तर… हात आणि पाय वेगळे केले असते…”, हा संवाद “तुम्ही भाग्यवान आहात, राजेशाही असती तर… तुमचे हात आणि पाय वेगळे केले असते…” ने बदलावा लागेल.
‘मांग’, ‘महार’ यांसारखे शब्द ‘ऐसी छोटी छोटी जाती’ बदलावे.
जातिव्यवस्थेवर मनु महाराजांच्या व्हॉईस ओव्हरमध्ये “आबादी है आबाद… और उनका जीवन साथ होगा…” च्या जागी “आबादी है, आबाद नहीं… आझादी की…” असा बदल करावा.
चित्रपटाच्या एका सबटायटलमध्ये वर्ष चुकीचे आहे, ते बदलले पाहिजे.
“तीन एम आहेत… आणि आपण तेच करणार आहोत…” हा संवाद काढून टाकावा.
निर्माते AWBI प्रमाणपत्र सादर करतात.
चित्रपटात दाखवलेल्या ऐतिहासिक गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या संदर्भांशी संबंधित कागदपत्रे सादर करा.
चित्रपटाच्या सबटायटल्समधून ‘जात’ हा शब्द काढून टाकावा आणि त्याऐवजी ‘वर्णा’ हा शब्द वापरावा.
या 12 बदलांनंतर सेन्सॉर बोर्ड ‘फुले’ चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देईल. याचा अर्थ 12 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कोणीही हा चित्रपट पाहू शकतात. मात्र, 12 वर्षांखालील मुले त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली हा चित्रपट पाहू शकतात.
‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली
‘फुले’ हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात समाजसुधारक, विचारवंत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या संघर्षाची कहाणी दाखवली जाणार आहे. फुले दाम्पत्याने अस्पृश्यांसाठी केलेले काम, त्यांनी समाजात आणलेल्या सुधारणा, महिला शिक्षणासाठी उचललेली पावले हे सर्व मोठ्या पडद्यावर दाखवले जाईल. फुले दाम्पत्याने समाजातील मागासवर्गीयांसाठी केलेले कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. या सिनमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी केले आहे. स्कॅम 1992 वेब सिरीज फेम अभिनेता प्रतिक गांधी ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारत आहे, तर सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा दिसणार आहे. 11 एप्रिल रोजी फुले चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण, त्याची तारीख बदलण्यात आली असून, आता 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

