पुणे- एका व्यावसायिकाच्या हत्येची खळबळजनक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. घोसी पोलीस स्टेशन हद्दीतील माननपूर गावाजवळ शनिवारी, १२ एप्रिल रोजी सकाळी मृतदेह आढळून आला होता.त्यानंतर सोमवार १४ एप्रिल रोजी मृतदेहाची ओळख पटली. मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण साधू शिंदे असे आहे. हा पुण्यातील एक व्यापारी होता आणि तो भंगार व्यवसायिक होता.
प्राप्त माहितीनुसार,सायबर गुंडांनी कोथरूडमधील व्यावसायिकाला पाटण्याला बोलावले आणि नंतर त्याचे अपहरण करून हत्या केली. गळा दाबून या ५५ वर्षीय उद्योगपतीचा खून करण्यात आला आहे. कंपनीच्या कामासाठी मेल करून या व्यक्तीला पाटण्याला बोलवले होते. कंपनीचे काही टूल्स आणि मशीनरी स्वस्त भावात विकत देतो, असा आरोपींकडून उद्योगपतीला मेला आला होता.
स्वस्तात मशिनरी मिळेल यासाठी उद्योगपती लक्ष्मण साधू शिंदे बिहारला गेले होते. त्यानंतर तिथे त्यांची हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबाकडून देण्यात आली होती. खून का केला याच कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र बिहारच्या स्पेशल टीमने या संदर्भात पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.आरोपींनी त्यांची हत्या करून बिहारच्या-जेहानबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 33 वर टाकून दिला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. पाटणा पोलिसांकडेही लक्ष्मण शिंदे गायब झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हत्या झाल्यानंतर बिहार पोलिसांच्या विशेष पथकाने पाच संशयितांना जेहानबाद आणि नालंदा या जिल्ह्यातून अटक केली.
तसेच त्यांचा मृतदेह आणण्यासाठी पुणे पोलीस बिहारमध्ये दाखल झाले आहेत. या काळात, गुन्हेगारांनी त्या व्यावसायिकाला पाटणा, नालंदा आणि जहानाबाद येथे नेले असावे, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचे पडसाद पाटणा पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचले आहेत. या हाय-प्रोफाइल खून प्रकरणाचा तपास पाटणा, जहानाबाद आणि नालंदा पोलीस संयुक्तपणे करत आहेत. या प्रकरणी बिहार पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.