स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जाहीरपणे मांडा-देशात पहिले बक्षीस घेतलेल्या’पुणे स्मार्ट सिटी’ प्रकल्पाला थेट आव्हान

Date:

१४ प्रश्नांची उत्तरे जाहीर करा ….

पुणे- देशात स्मार्ट सिटीचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस घेणाऱ्या पुणे स्मार्ट सीटी प्रकल्पाने आपल्या स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाहीरपणे मांडावा असे थेट आव्हान भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे प्रदेश संयोजक आणि पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता उज्ज्वल केसकर,माजी विरोधी पक्ष नेता सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.

या तिघांनी दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे कि,’
आज पासून पुणे स्मार्ट सिटी मिशन समाप्त होत आहे.
कुठलाही महत्त्वकांक्षी केंद्रीय कार्यक्रम हा विशिष्ट कालावधीसाठी आणि विशिष्ट उद्देश पूर्तीसाठी आखला जातो त्या कालावधीमध्ये त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते.
उदाहरणार्थ JNURM इत्यादी
पुणे महानगरपालिकेची स्मार्ट सिटी ही अखिल भारतीय स्पर्धेमध्ये प्रथम आली होती.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी मिशन देशाला पुण्यातून अर्पण केले होते.
पुणे स्मार्ट सिटी ची खालील प्रमाणे प्रमुख वैशिष्ट्य आणि उद्देश होते.
१) पुणे स्मार्ट सिटी मोहिमेचे उद्दिष्ट पुण्याला शाश्वत, राहण्यायोग्य आणि लवचिक शहरात रूपांतरित करणे आहे.
२) अभियान शाश्वत पायाभूत सुविधा विकास, सार्वजनिक सुविधा वाढवणे आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापरासाठी स्मार्ट उपाय लागू करणे.
३) शहर विश्वासार्ह आणि सुलभ सार्वजनिक सेवा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि हिरवीगार जागा प्रदान करून नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणे
४) डिजिटल परिवर्तन आणि नवोपक्रम, डिजिटल परिवर्तन, ई-गव्हर्नन्स आणि नागरिक-केंद्रित सेवा चालविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
५) स्मार्ट वाहतूक व्यवस्था: बुद्धिमान वाहतूक, व्यवस्थापन, रिअल-टाइम वाहन ट्रॅकिंग आणि स्मार्ट पार्किंग उपाययोजना लागू करणे.
६) स्मार्ट ग्रिड प्रणाली वीज वितरणाचे रिअल-टाइम देखरेख आणि नियंत्रणासह बुद्धिमान ऊर्जा व्यवस्थापन सक्षम करणे.
७) नागरिकांचा सहभाग
A) मोबाइल अॅप्स, सोशल मीडिया आणि समुदाय पोहोच कार्यक्रमांद्वारे नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.

८) पुणे स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत काही उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये हे समाविष्ट आहे.

a)डिजिटल एक्सपिरीयन्स सेंटर
b) नागरिकांना एकत्र येऊन विकास परिस्थितींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ.
c) स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग: पारंपारिक प्रकाश योजने ऐवजी ऊर्जा-कार्यक्षम एलईडी दिवे.
d) ई-बस: वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस सादर करणे.
e) विमानतळ एक्सप्रेस सेवा,विमानतळावर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी एक समर्पित शटल सेवा.
या (smart City mission) उपक्रमांचे उद्दिष्ट पुणे शहराला त्याच्या नागरिकांसाठी अधिक राहण्यायोग्य, शाश्वत आणि लवचिक शहर बनवणे हा होता.
या संकल्पनेतून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे मिशन सुरू केले.
आता हे मिशन संपल्यानंतर खालील बाबींचा आढावा घेणे आणि तो स्मार्ट पुणे संकेतस्थळावर टाकणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते त्यातील मुद्दे खालील प्रमाणे
१) पुणे स्मार्ट सिटी ५८ प्रकल्प स्वीकारले
२) ९०० कोटी रुपये खर्च केले.
३) स्वीकारलेले ५८ प्रकल्प कुठले ?
४) त्यातली अंमलबजावणी झालेले प्रकल्प कुठले ?
५) अंश:ता अंमलबजावणी झालेले प्रकल्प कुठले ?
६) सुरूच झाले नाहीत असे प्रकल्प कुठले ?
७) प्रत्येक प्रकल्पावर किती रक्कम खर्ची पडली ?
८) किती रक्कम देणे बाकी आहे ?
९) प्रकल्प सल्लागार कोण होते ?
१०) त्यांनी ५८ प्रकल्पाचे DPR तयार केले आहे का ?
११) त्या सल्लागारांना एकंदरीत किती सल्ला फी दिली ?
१२) उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती रकमेची आणि किती वेळेची आवश्यकता आहे ?
१३) हे सर्व प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यामुळे आणि महानगरपालिकेने अंदाजपत्रक मांडल्यामुळे यासाठी कुठल्या कुठल्या निधीला वर्गीकरणाद्वारे कात्री लावून या प्रकल्पाकडे पैसे वर्ग करणार ?
१४) का हे प्रकल्प वाऱ्यावर सोडणार ?

याबाबत आज अस्तित्वात असलेल्या स्मार्ट सिटी च्या मुख्याधिकाऱ्याने जाहीर केले पाहिजे ही आमची मागणी आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...