पुणे:ई टॅक्सी ला दिलेली मंजुरी महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावी, अन्यथा या निर्णयाला पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रभर तीव्र विरोध करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, व ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले,
काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारने मुंबई येथे टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिली आहे, खरं तर मुंबई येथील ऑटो टॅक्सी संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध करणे आवश्यक होते परंतु त्यांनी विरोध केला नाही यामुळे आता सरकारचे धाडस वाढले असून सरकारच्या वतीने महाराष्ट्रभर ई बाईक टॅक्सीला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो चालक मालकांचे, तसेच पाच लाख टॅक्सी चालक-मालकांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार असून, अगोदरच विविध कारणांमुळे अडचणीमध्ये आलेल्या ऑटो टॅक्सी चालकांचे जगणे मुश्किल होईल, आणि त्यांचे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण होतील, आज महाराष्ट्रामध्ये ई बाईक टॅक्सीची अजिबात आवश्यकता नाही, त्या तुलनेत प्रवासी देखील नाहीत, प्रवासी संख्या अत्यंत कमी झाली आहे, त्याला वेगवेगळे कारण आहेत अनेकांनी स्वतःच्या दुचाकी व चार चाकी गाड्या विकत घेतले आहेत, तसेच बस व मेट्रो यामुळे देखील प्रवाशांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहे, यामध्ये ई बाईक टॅक्सी आल्यास एका भाकरी मध्ये अनेक तुकडे होतील आणि यामध्ये कोणालाही पोटभर अन्न मिळणार नाही, गोरगरीब कष्टकऱ्यांमध्ये आपापसामध्ये प्रवाशावरून भांडण लावण्याचे काम सरकारने करू नये, ऑटो टॅक्सी चालकांचे फार मोठे नुकसान या निर्णयामुळे होणार असून, याबाबत ऑटो टॅक्सी चालकांनी एकत्र येऊन संघर्ष करणे आवश्यक असल्याचे देखील बाबा कांबळे यावेळी म्हणाले,
बाबा कांबळे म्हणाले लवकरच पुणे पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्रातील आटो टॅक्सी चालकांची बैठक बोलून यामध्ये महाराष्ट्रातील सर्व संघटनांना एकत्र घेऊन, पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल व सर्वांच्या सहमतीने याबाबत योग्य ते निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात येईल, निवेदन देऊन देखील मागण्या मान्य न झाल्यास किंवा ई टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास पुढील दिशा ठरवण्यात येईल असे यावेळी बाबा कांबळे यांनी सांगितले.